शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आठ हजार तक्रारी; केवळ १११ शेतकऱ्यांना मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST

यावर्षी हंगामात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उगवण विषयक तक्रारी वाढल्या. त्यासोबत जिल्ह्यात अनेक भागात सदोष ...

यावर्षी हंगामात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उगवण विषयक तक्रारी वाढल्या. त्यासोबत जिल्ह्यात अनेक भागात सदोष सोयाबीनचा पुरवठा झाल्याने उगवणशक्ती प्रभावीत झाली. सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कष्ट व मजुरी यावरील संपूर्ण खर्च वाया गेला. सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये महाबीज बियाणे व खासगी कंपनी बियाणे अशा जिल्ह्यात ८ हजार ३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी पाहणीदरम्यान ६८१ तक्रारीत बियाणे सदोष आढळून आले होते. सदोष बियाणे संदर्भात पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने कंपन्यावर न्यायालयीन दावे दाखल केले आहे. याप्रकरणी निपटारा सुरू केला; मात्र यातील केवळ १११ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. उर्वरित ५७० शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात आली नाही. सदोष बियाणे आढळणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे व रोख स्वरुपात रक्कम दिली गेली.

--बॉक्स--

महाबीजच्या प्राप्त तक्रारी

३३६१

खासगी कंपनीच्या प्राप्त तक्रारी

४६७८

महाबीजचे आढळलेले सदोष बियाणे

३३५

खासगी कंपनीचे आढळलेले सदोष बियाणे

३४६

--बॉक्स--

असा मिळाला मोबदला

मोबदल्याच्या स्वरुपात महाबीजने ५ शेतकऱ्यांना २२ बियाण्यांच्या बॅग दिल्या, तर ३५ शेतकऱ्यांना ३ लाख ६६ हजार ४०० रुपये रोख रक्कम दिली. तसेच खासगी कंपनीने २७ शेतकऱ्यांना १५१ बियाणे बॅग दिल्या, तर ४४ शेतकऱ्यांना ५ लाख २४ हजार ४६० रुपये रोख रक्कम दिली.

--बॉक्स--

उर्वरित तक्रारींचा निपटारा कठीणच!

सदोष आढळलेल्या ६८१ तक्रारींपैकी ५७० शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात आली नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यास कंपन्या इच्छुक नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यापुढेही या शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीणच झाले आहे.