शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हे भूतकाळासाठी नाही, भविष्यकाळासाठी असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:17 IST

अकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते.  मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.

ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला पुष्प सहावे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते.  मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्यावतीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना प्रा. पानसे बोलत होते. सोमवारी प्रा. पानसे यांनी ‘परिवर्तनासाठी नवा शिक्षण विचार’ या विषयावर प्रबोधन केले. तत्पूर्वी प्रा. पानसे यांचा परिचय प्रा. नारायण कुळकर्णी-कवठेकर यांनी करू न दिला. पाहुण्यांचे स्वागत प्रा. सुरेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनुराग मिश्र यांनी केले.सध्या आपल्याकडील शालेय शिक्षण अतिशय वाईट आहे. पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचे काही येत नाही, असे चित्र असल्यामुळे शिक्षणात परिवर्तनाची गरज आहे. शिक्षणाशी संबंधित असणार्‍या शिक्षक, पालक, शाळा संस्थापक असे सर्व घटकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. तसेच आजच्या शिक्षण पद्धतीत मूलभतू परिवर्तन करणे आवश्यक आहे. शिक्षण हे नेहमी शिकणार्‍यांच्या जीवनासाठी असते. केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता नसते. शिक्षण हे नेहमी प्रवाही असावे लागते. विसाव्या शतकातील शिक्षण एकाच पठडीतील आहे. एवढचं नव्हे, तर पुढली पिढीही तेच शिक्षण घेत आहे. विसाव्या शतकाचे स्वरू प असे होते, की तो काळ औद्योगिक काळ होता. औद्योगिक काळात जो एकवेळा एक काम करीत होते. आयुष्यभर तेच काम त्याला करावे लागत असे.  विसाव्या शतकातील शैली परिवर्तनवादी होती. मात्र, एकविसाव्या शतकात वर्तनवादी झाली.  जीवनशैली वेगाने बदलत असली, तरी  शिक्षण मात्र तेथेच अडकले, अशी खंत प्रा. पानसे यांनी व्यक्त केली.शिक्षक वर्गात मुलांना चांगले शिकवितात, पण ते केवळ विषय शिकवितात. मुलांना शिकवित नाही. शिक्षक शिकवितो. मुले समोर असतात. शिक्षक मुलांना विषय शिकविण्याची जबाबदारी घेतो; पण मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेत नाही. किती शिक्षक शिकविताना मुलांच्या मानसिक, सामाजिक क्षमतांचा विचार करतात. मुलांची आकलन क्षमतेचाही विचार करीत नाहीत. आकलनशास्त्र  सध्याच्या शिक्षण पद्धतीतील मोठ देणगी असल्याचे प्रा.पानसे म्हणाले.-