शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

शिक्षण हे भूतकाळासाठी नाही, भविष्यकाळासाठी असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:17 IST

अकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते.  मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.

ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला पुष्प सहावे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते.  मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्यावतीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना प्रा. पानसे बोलत होते. सोमवारी प्रा. पानसे यांनी ‘परिवर्तनासाठी नवा शिक्षण विचार’ या विषयावर प्रबोधन केले. तत्पूर्वी प्रा. पानसे यांचा परिचय प्रा. नारायण कुळकर्णी-कवठेकर यांनी करू न दिला. पाहुण्यांचे स्वागत प्रा. सुरेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनुराग मिश्र यांनी केले.सध्या आपल्याकडील शालेय शिक्षण अतिशय वाईट आहे. पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचे काही येत नाही, असे चित्र असल्यामुळे शिक्षणात परिवर्तनाची गरज आहे. शिक्षणाशी संबंधित असणार्‍या शिक्षक, पालक, शाळा संस्थापक असे सर्व घटकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. तसेच आजच्या शिक्षण पद्धतीत मूलभतू परिवर्तन करणे आवश्यक आहे. शिक्षण हे नेहमी शिकणार्‍यांच्या जीवनासाठी असते. केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता नसते. शिक्षण हे नेहमी प्रवाही असावे लागते. विसाव्या शतकातील शिक्षण एकाच पठडीतील आहे. एवढचं नव्हे, तर पुढली पिढीही तेच शिक्षण घेत आहे. विसाव्या शतकाचे स्वरू प असे होते, की तो काळ औद्योगिक काळ होता. औद्योगिक काळात जो एकवेळा एक काम करीत होते. आयुष्यभर तेच काम त्याला करावे लागत असे.  विसाव्या शतकातील शैली परिवर्तनवादी होती. मात्र, एकविसाव्या शतकात वर्तनवादी झाली.  जीवनशैली वेगाने बदलत असली, तरी  शिक्षण मात्र तेथेच अडकले, अशी खंत प्रा. पानसे यांनी व्यक्त केली.शिक्षक वर्गात मुलांना चांगले शिकवितात, पण ते केवळ विषय शिकवितात. मुलांना शिकवित नाही. शिक्षक शिकवितो. मुले समोर असतात. शिक्षक मुलांना विषय शिकविण्याची जबाबदारी घेतो; पण मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेत नाही. किती शिक्षक शिकविताना मुलांच्या मानसिक, सामाजिक क्षमतांचा विचार करतात. मुलांची आकलन क्षमतेचाही विचार करीत नाहीत. आकलनशास्त्र  सध्याच्या शिक्षण पद्धतीतील मोठ देणगी असल्याचे प्रा.पानसे म्हणाले.-