शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ई-पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ई-पास सक्तीचे करण्यात आले आहेत. मात्र शहरात ई-पास नावालाच असून, कुणीही यावे, टिकली मारून जावे अशी परिस्थिती आहे.

राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही रविवारी शहराच्या चारही मार्गावर पाहणी केली असता शहरात ई-पास नावालाच असल्याचे दिसून आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे; मात्र तिथे कुणालाही अडवले जात नसल्याचे दिसून येत होते. सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान, शहराच्या टोकांवर कुठलाही बंदोबस्त किंवा पोलीस दिसून आला नव्हता. वाहनांची तपासणीही सुरू नसल्याचे दिसून आले. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ई-पास अनिवार्य केली असून, या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र दुसरीकडे शहरात दाखल होणाऱ्यांना ई-पास तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळत असल्याचे रविवारी दिसून आले.

------------------------------------

बाळापूर-अकोला मार्ग (बाळापूर नाका)

कोरोनाची स्थिती शहरापेक्षा ग्रामीण भागात अतिशय वाईट आहे. ग्रामीण भागातील संदिग्ध रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. बाळापूर-अकोला मार्गावरील बाळापूर नाका येथे कोणीही पोलीस कर्मचारी रविवारी दिसून आला नाही.

----------------------------------------

पातूर-अकोला रोड (हिंगणा बायपास)

पातूर-अकोला मार्गाने शहरात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हिंगणा बु. तसेच पुढे रस्त्यावर पाहणी केली असता कोणीही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. वाहनांची मात्र ये-जा सुरूच असल्याचे दिसून आले.

---------------------------------

बार्शीटाकळी-अकोला रोड (खडकी, शिवापूर)

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शहरात प्रवेश करण्यासाठी ई-पास आवश्यक असताना बार्शीटाकळी-अकोला मार्गावर कुणीही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे नियमांकडे पाठ दाखविल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------------------

ई-पासच्या नियमांबाबत अनेक जण अनिभिज्ञ

अत्यावश्यक सेवेसाठी बाहेरील जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागातून शहरात प्रवेश करण्यासाठी ई-पास गरजेचे आहे. रविवारी काही प्रवाशांना विचारणा केली असता अनेकांना ई-पासविषयी माहितीच नसल्याचे सांगितले. शहराला जोडणाऱ्या मार्गावर पोलीस दिसून न आल्याने वाहनांची बिनधास्त ये-जा सुरू होती.