शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

ई-पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ई-पास सक्तीचे करण्यात आले आहेत. मात्र शहरात ई-पास नावालाच असून, कुणीही यावे, टिकली मारून जावे अशी परिस्थिती आहे.

राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही रविवारी शहराच्या चारही मार्गावर पाहणी केली असता शहरात ई-पास नावालाच असल्याचे दिसून आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे; मात्र तिथे कुणालाही अडवले जात नसल्याचे दिसून येत होते. सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान, शहराच्या टोकांवर कुठलाही बंदोबस्त किंवा पोलीस दिसून आला नव्हता. वाहनांची तपासणीही सुरू नसल्याचे दिसून आले. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ई-पास अनिवार्य केली असून, या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र दुसरीकडे शहरात दाखल होणाऱ्यांना ई-पास तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळत असल्याचे रविवारी दिसून आले.

------------------------------------

बाळापूर-अकोला मार्ग (बाळापूर नाका)

कोरोनाची स्थिती शहरापेक्षा ग्रामीण भागात अतिशय वाईट आहे. ग्रामीण भागातील संदिग्ध रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. बाळापूर-अकोला मार्गावरील बाळापूर नाका येथे कोणीही पोलीस कर्मचारी रविवारी दिसून आला नाही.

----------------------------------------

पातूर-अकोला रोड (हिंगणा बायपास)

पातूर-अकोला मार्गाने शहरात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हिंगणा बु. तसेच पुढे रस्त्यावर पाहणी केली असता कोणीही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. वाहनांची मात्र ये-जा सुरूच असल्याचे दिसून आले.

---------------------------------

बार्शीटाकळी-अकोला रोड (खडकी, शिवापूर)

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शहरात प्रवेश करण्यासाठी ई-पास आवश्यक असताना बार्शीटाकळी-अकोला मार्गावर कुणीही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे नियमांकडे पाठ दाखविल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------------------

ई-पासच्या नियमांबाबत अनेक जण अनिभिज्ञ

अत्यावश्यक सेवेसाठी बाहेरील जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागातून शहरात प्रवेश करण्यासाठी ई-पास गरजेचे आहे. रविवारी काही प्रवाशांना विचारणा केली असता अनेकांना ई-पासविषयी माहितीच नसल्याचे सांगितले. शहराला जोडणाऱ्या मार्गावर पोलीस दिसून न आल्याने वाहनांची बिनधास्त ये-जा सुरू होती.