शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

समन्वयाअभावी पोलीस-नागरिकांमध्ये दरी!

By admin | Updated: April 30, 2015 01:51 IST

संवाद वाढविण्याची गरज, विश्‍वास निर्माण करण्यासाठी अधिका-यांनी घ्यावा पुढाकार, परिचर्चेतील सूर.

अकोला- कापशी प्रकरणात निष्पाप लोकांवर पोलिसांनी केलेले अत्याचार आणि त्यापूर्वी पोलिसांवर झालेला हल्ला, या दोन्ही घटना पोलीस आणि जनतेतील दरी किती रुंदावली आहे, हे स्पष्ट करणार्‍या होत्या. पोलिसांनी नागरिकांचे मित्र म्हणून काम केले पाहिजे, असा शासनाचा प्रयत्न असतो, तर नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे. अलीकडच्या काळात मात्र समन्वयाअभावी दोन्ही बाजूने टोकाची भूमिका घेतली जात असल्याचे आढळून येते. पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने नियमित संवाद होणे गरजेचे असून, पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली दरी कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर लोकमतने बुधवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. अकोला लोकमत शहर कार्यालयात बुधवारी दुपारी ह्यपोलीस नागरिकांचे मित्र का बनू शकले नाहीतह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत नवृत्त साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, बालकल्याण समिती सदस्य अँड. संगीता भाकरे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, सचिन गाढेकर, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, परवानाधारक ऑटोरिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शर्मा, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अजय वाघमारे, उपाध्यक्ष अँड. प्रवीण तायडे आदी सहभागी झाले होते. या मान्यवरांनी अकोला शहरातील पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत पोलीस आणि नागरिकांमधील दरी वाढण्यास वरिष्ठ अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सांगितले. कधीकाळी अकोल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरातील रस्त्यांवर फिरताना आढळत होते. चौकाचौकांतून फिरताना दिसायचे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये कर्तव्याबाबत शिस्त होती. गुन्हेगारांवर, टवाळखोरांवर वचक राहत होता. आता वरिष्ठ अधिकार्‍यांचा चेहरासुद्धा सर्वसामान्यांना बघावयास मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत असून, पोलिसांवरील नागरिकांचा विश्‍वास उडत आहे. हा विश्‍वास परत मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटला. त्याचवेळी पोलीस कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे, तोही मनुष्यच आहे. त्यालाही काही र्मयादा आहेत. त्यामुळे समाजाने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांशी संवाद वाढविणे हा एक उपाय असल्याचे मान्यवरांनी सांगितले.