शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

समन्वयाअभावी पोलीस-नागरिकांमध्ये दरी!

By admin | Updated: April 30, 2015 01:51 IST

संवाद वाढविण्याची गरज, विश्‍वास निर्माण करण्यासाठी अधिका-यांनी घ्यावा पुढाकार, परिचर्चेतील सूर.

अकोला- कापशी प्रकरणात निष्पाप लोकांवर पोलिसांनी केलेले अत्याचार आणि त्यापूर्वी पोलिसांवर झालेला हल्ला, या दोन्ही घटना पोलीस आणि जनतेतील दरी किती रुंदावली आहे, हे स्पष्ट करणार्‍या होत्या. पोलिसांनी नागरिकांचे मित्र म्हणून काम केले पाहिजे, असा शासनाचा प्रयत्न असतो, तर नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे. अलीकडच्या काळात मात्र समन्वयाअभावी दोन्ही बाजूने टोकाची भूमिका घेतली जात असल्याचे आढळून येते. पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने नियमित संवाद होणे गरजेचे असून, पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली दरी कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर लोकमतने बुधवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. अकोला लोकमत शहर कार्यालयात बुधवारी दुपारी ह्यपोलीस नागरिकांचे मित्र का बनू शकले नाहीतह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत नवृत्त साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, बालकल्याण समिती सदस्य अँड. संगीता भाकरे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, सचिन गाढेकर, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, परवानाधारक ऑटोरिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शर्मा, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अजय वाघमारे, उपाध्यक्ष अँड. प्रवीण तायडे आदी सहभागी झाले होते. या मान्यवरांनी अकोला शहरातील पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत पोलीस आणि नागरिकांमधील दरी वाढण्यास वरिष्ठ अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सांगितले. कधीकाळी अकोल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरातील रस्त्यांवर फिरताना आढळत होते. चौकाचौकांतून फिरताना दिसायचे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये कर्तव्याबाबत शिस्त होती. गुन्हेगारांवर, टवाळखोरांवर वचक राहत होता. आता वरिष्ठ अधिकार्‍यांचा चेहरासुद्धा सर्वसामान्यांना बघावयास मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत असून, पोलिसांवरील नागरिकांचा विश्‍वास उडत आहे. हा विश्‍वास परत मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटला. त्याचवेळी पोलीस कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे, तोही मनुष्यच आहे. त्यालाही काही र्मयादा आहेत. त्यामुळे समाजाने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांशी संवाद वाढविणे हा एक उपाय असल्याचे मान्यवरांनी सांगितले.