शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

समन्वयाअभावी पोलीस-नागरिकांमध्ये दरी!

By admin | Updated: April 30, 2015 01:51 IST

संवाद वाढविण्याची गरज, विश्‍वास निर्माण करण्यासाठी अधिका-यांनी घ्यावा पुढाकार, परिचर्चेतील सूर.

अकोला- कापशी प्रकरणात निष्पाप लोकांवर पोलिसांनी केलेले अत्याचार आणि त्यापूर्वी पोलिसांवर झालेला हल्ला, या दोन्ही घटना पोलीस आणि जनतेतील दरी किती रुंदावली आहे, हे स्पष्ट करणार्‍या होत्या. पोलिसांनी नागरिकांचे मित्र म्हणून काम केले पाहिजे, असा शासनाचा प्रयत्न असतो, तर नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे. अलीकडच्या काळात मात्र समन्वयाअभावी दोन्ही बाजूने टोकाची भूमिका घेतली जात असल्याचे आढळून येते. पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने नियमित संवाद होणे गरजेचे असून, पोलीस आणि नागरिकांमधील वाढलेली दरी कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर लोकमतने बुधवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. अकोला लोकमत शहर कार्यालयात बुधवारी दुपारी ह्यपोलीस नागरिकांचे मित्र का बनू शकले नाहीतह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत नवृत्त साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, बालकल्याण समिती सदस्य अँड. संगीता भाकरे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, सचिन गाढेकर, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, परवानाधारक ऑटोरिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शर्मा, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अजय वाघमारे, उपाध्यक्ष अँड. प्रवीण तायडे आदी सहभागी झाले होते. या मान्यवरांनी अकोला शहरातील पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत पोलीस आणि नागरिकांमधील दरी वाढण्यास वरिष्ठ अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सांगितले. कधीकाळी अकोल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरातील रस्त्यांवर फिरताना आढळत होते. चौकाचौकांतून फिरताना दिसायचे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये कर्तव्याबाबत शिस्त होती. गुन्हेगारांवर, टवाळखोरांवर वचक राहत होता. आता वरिष्ठ अधिकार्‍यांचा चेहरासुद्धा सर्वसामान्यांना बघावयास मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत असून, पोलिसांवरील नागरिकांचा विश्‍वास उडत आहे. हा विश्‍वास परत मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर चर्चेतून उमटला. त्याचवेळी पोलीस कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे, तोही मनुष्यच आहे. त्यालाही काही र्मयादा आहेत. त्यामुळे समाजाने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांशी संवाद वाढविणे हा एक उपाय असल्याचे मान्यवरांनी सांगितले.