शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

दुष्काळाची मदत पोहोचली; अतिवृष्टीची केव्हा मिळणार?

By admin | Updated: February 7, 2015 02:37 IST

१२ हजारांवर अतिवृष्टिग्रस्त शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा.

संतोष येलकर / अकोला:जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला असला तरी गेल्या जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची मदत अद्याप मिळाली नाही. अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाईची मदत केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा जिल्ह्यातील चार तालुक्यांतील अतवृष्टिग्रस्त १२ हजार १६६ शेतकरी करीत आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात २२ व २३ जुलै रोजी दोन दिवस जिल्ह्यात अतवृष्टी झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांतील खरीप पिकांना या अतवृष्टीचा तडाखा बसला होता. या चार तालुक्यांमधील २३७ गावांमध्ये १२ हजार १६६ शेतकर्‍यांचे ९ हजार ९६९ हेक्टर ४0 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ८ हजार २६२ हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर १ हजार ७0६ हेक्टर ९७ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांच्या आत नुकसान झाले. या पीक नुकसानीचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, कृषी साहाय्यक व ग्रामसेवकांकडून करण्यात आले. अतवृष्टीमुळे झालेल्या या पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत ७ नोव्हेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. दरम्यान, यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत पहिल्या टप्प्यात गत जानेवारीमध्ये ७५ कोटी ११ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. तसेच ४ फेब्रुवारी रोजी ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला; मात्र सहा महिन्यांपूर्वी अतवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानभरपाईची मदत अद्यापही शासनाकडून प्राप्त झाली नाही. ही मदत शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील अतवृष्टिग्रस्त १२ हजार १६६ शेतकर्‍यांकडून केली जात आहे.दरम्यान अतवृष्टीमुळे गत जुलैमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांत झालेल्या पीक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून मदतनिधीसाठी शासनाकडे पाठपुरावा होत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगीतले.