शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

दुष्काळ संपला; पण शेतकरी आत्महत्या थांबेनात!

By admin | Updated: August 25, 2016 02:04 IST

तीन महिन्यांत जिल्ह्यात २८ शेतक-यांच्या आत्महत्या.

संतोष येलकरअकोला, दि. २४: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील दुष्काळ संपला असला, तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नसल्याची बाब समोर येत आहे.गत काही वर्षात बदलत्या वातावरणात कधी अत्यल्प पाऊस, कधी अतवृष्टी तर कधी वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच गत दोन वर्षांच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला होता. सतत दोन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत; मात्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले नाही. सन २0१४ मध्ये जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४१ आणि २0१५ मध्ये ४७ शेतकरी आत्महत्या झाल्या. तर सन २0१६ या वर्षात जून ते २४ ऑगस्टपर्यंत या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी गत दोन वर्षातील दुष्काळानंतर, यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला; मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबल्या नसल्याची स्थिती आहे.