राजरत्न सिरसाट/ अकोला: ग्रामीण भागातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करू न त्या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १0६ गावांमध्ये हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. तथापि, या कामासाठी मंजूर झालेल्या १00 कोटींच्या निधीपैकी १0 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित निधी कपात करण्यात आल्याने या प्रकल्पांच्या कामावरही पाणी फिरले आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी राज्यातील काही शहरांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या पाण्याचा पुनर्वापरही करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना आखण्यात आली असून, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे शुद्ध केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यावर नाशिक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आधुनिक तंत्रज्ञान साहाय्य संशोधन विभागात संशोधन करण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता सूक्ष्म पातळीवर नियोजनही करण्यात आले असून, पोषक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. ह्यफायटोराइटह्ण जातीचे वृक्ष सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यास उपयोगी ठरत असल्याचे संशोधनही झाले आहे. राज्यातील १0६ गावांत हा प्रकल्प राबविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास बँक (नाबार्ड) ने १00 कोटी रुपये दिले होते. या रकमेतील दहा कोटीच या प्रकल्पाच्या कामांना मिळाले आहेत. दरम्यान, सध्या पुणे विभाग चार, जळगाव जिल्ह्यात दोन आणि अमरावती विभागात दोन अशा आठ प्रकल्पांची कामे सुरू असल्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे; मात्र या प्रकल्पांना निधी कमी पडल्यास ते देखील अर्धवट राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात ग्रामीण भागात आठ ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. निधीची पूर्तता झाल्यावर उर्वरित प्रकल्पांची कामे सुरू केली जातील. या प्रकल्पामुळे वाया जाणार्या सांडपाण्याचा यथोचित वापर होणार असल्याच् ोमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता डी.सी. लांडगे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पावर फिरले पाणी!
By admin | Updated: December 16, 2015 02:04 IST