शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पावर फिरले पाणी!

By admin | Updated: December 16, 2015 02:04 IST

राज्यातील १0६ गावांमध्ये प्रकल्प; १00 कोटींच्या निधीपैकी केवळ १0 कोटी रुपये मिळाले.

राजरत्न सिरसाट/ अकोला: ग्रामीण भागातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करू न त्या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १0६ गावांमध्ये हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. तथापि, या कामासाठी मंजूर झालेल्या १00 कोटींच्या निधीपैकी १0 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित निधी कपात करण्यात आल्याने या प्रकल्पांच्या कामावरही पाणी फिरले आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी राज्यातील काही शहरांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या पाण्याचा पुनर्वापरही करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना आखण्यात आली असून, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे शुद्ध केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यावर नाशिक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आधुनिक तंत्रज्ञान साहाय्य संशोधन विभागात संशोधन करण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता सूक्ष्म पातळीवर नियोजनही करण्यात आले असून, पोषक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. ह्यफायटोराइटह्ण जातीचे वृक्ष सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यास उपयोगी ठरत असल्याचे संशोधनही झाले आहे. राज्यातील १0६ गावांत हा प्रकल्प राबविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास बँक (नाबार्ड) ने १00 कोटी रुपये दिले होते. या रकमेतील दहा कोटीच या प्रकल्पाच्या कामांना मिळाले आहेत. दरम्यान, सध्या पुणे विभाग चार, जळगाव जिल्ह्यात दोन आणि अमरावती विभागात दोन अशा आठ प्रकल्पांची कामे सुरू असल्याचा दावा संबंधित विभागाकडून केला जात आहे; मात्र या प्रकल्पांना निधी कमी पडल्यास ते देखील अर्धवट राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात ग्रामीण भागात आठ ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. निधीची पूर्तता झाल्यावर उर्वरित प्रकल्पांची कामे सुरू केली जातील. या प्रकल्पामुळे वाया जाणार्‍या सांडपाण्याचा यथोचित वापर होणार असल्याच् ोमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता डी.सी. लांडगे यांनी स्पष्ट केले.