शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तांडावस्ती सुधार योजनेचा आराखडाच तयार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:58 IST

समितीचे गठन न झाल्याने तांडा वस्ती विकास योजनेचा २०१८-१९ ते २०२२-२३ हा पंचवार्षिक विकास आराखडा अद्यापही तयार झाला नाही.

अकोला : तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे ३० जानेवारी २०१८ रोजी पुनर्गठन करण्याच्या आदेशानंतर योजनेसाठी पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यास दोन वर्षांचा विलंब झाला आहे. त्यासाठी १४ जानेवारी रोजी बैठक घेत आराखडा तयार करण्याची घिसाडघाई करण्यात आली आहे.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून विकास कामे करण्यासाठी पंचवार्षिक बृहत आराखडा मंजूर केला जातो. त्या आराखड्यानुसार वसंतराव नाईक तांडा-वस्ती सुधार योजनेंतर्गत लमाण, बंजारा व भटक्या जमाती समाजाच्या तांडा वस्तीचा विकास केला जातो. तसेच या समाजाच्या नागरिकांना ५० अधिक ५० टक्के लाभ दिला जातो. त्यामध्ये गावांची व कामांची निवडही समितीकडून केली जाते. तसेच त्यानुसार निधी वाटपही केले जाते. राज्यातील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा आराखडा तयार करणाऱ्या जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यासाठी शासनाने ३० जानेवारी २०१८ रोजीच आदेश दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात या समितीचे गठन करण्यास प्रचंड विलंब झाला. समितीचे गठन न झाल्याने तांडा वस्ती विकास योजनेचा २०१८-१९ ते २०२२-२३ हा पंचवार्षिक विकास आराखडा अद्यापही तयार झाला नाही. त्या पाच वर्षातील दोन वर्ष आता उलटले आहेत. गेल्या दोन वर्षाच्या काळातील पंचवार्षिक योजनेचा आराखडा मंजूर नसल्याने समाजकल्याण विभागाने या दोन वर्षात कोणत्या योजना राबवल्या, ही बाब आता संबंधितांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभाजिल्ह्यातील तांडा-वस्ती सुधार योजनेचा पंचवार्षिक आराखडा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली १४ जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली. त्या सभेची नोटीस समितीचे सचिव तथा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी १३ जानेवारी रोजी सर्व संबंधित अधिकाºयांना पाठवली. त्यामुळे या समितीची बैठक ऐनवेळी घेण्याची घिसाडघाई करण्याचा प्रकारही घडला आहे. दोन वर्ष उलटल्यानंतर आराखडा तयार होत असल्याने समाजाच्या विकास योजनांचा बोजवारा उडाल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला