शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘जलयुक्त’च्या कामात कुचराई केल्यास गय नाही!

By admin | Updated: May 17, 2017 02:05 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा: कामांचा ताळेबंद सादर करा; अन्यथा कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामात कुचराई केल्यास गय केली जाणार नाही, असे सांगत पूर्ण झालेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांचा ताळेबंद तातडीने सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील जिल्ह्यातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. ‘जलयुक्त शिवार’ची कामे प्रामाणिकपणे करण्याचे सांगून, कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सांगत सन २०१५-१६ मधील अपूर्ण कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करून, ‘जलयुक्त शिवार’च्या कामामुळे निर्माण होणारा पाण्याचा साठा, पाण्याचा वापर इत्यादी संबंधीचा ताळेबंद तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामांचा ताळेबंद सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला. सन २०१६-१७ मधील जलयुक्त शिवारची कामे येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करून, गावे जलयुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू. बोके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, कृषी सहायक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दहा हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करा!‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात दहा हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देत, शेततळ्यांच्या कामांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.गाळ काढण्याच्या कामांसाठी ग्रामस्तरीय बैठका घ्या!शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० गावतलाव आणि १० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन, शेतकऱ्यांना गाळ शेतात नेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करावयाची असून, गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्डच्या डिझेलचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.गावनिहाय कामांचा आराखडा प्रस्तावित करा!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात करावयाच्या कामांसाठी गावांची निवड करून, गावनिहाय आवश्यक असलेल्या कामांचा आराखडा तातडीने प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीत दिले.