शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यातील पिकांवर रोगराईचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

तेल्हारा : पावसाचा जोर कमी झाल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीच्या कामांना वेग दिला असून, फवारणीचे कामे ...

तेल्हारा : पावसाचा जोर कमी झाल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीच्या कामांना वेग दिला असून, फवारणीचे कामे सुरू आहेत. वातावरणातील बदलांमुळे तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील शेतशिवारात मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर रोगराईने थैमान घातले असून, कपाशीची फूल-पाती गळ सुरू झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने शेतकरी चिंतित सापडला होता. पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. वातावरणात बदल झाल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद पिकावर रोगराई पसरल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मनात्री, तळेगाव, मनब्दा, दापुरा या खारपाणपट्ट्यात रोगराई वाढल्याने शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. महागडे कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

------------------------

मूग, उडीद या पिकांवर रोगराई वाढली असून, पिकांची नासाडी होत आहे. हाताशी आलेले पीक निघून जात असल्याने चिंता वाढली आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.

- गजानन थोरात, शेतकरी मनात्री बु.

---------------

सध्या उडीद पिकावर मारुका अळी व मावा किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे, शेतकऱ्यांनी दोन्ही किडीचे व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे शिफारशीप्रमाणे मोनॉक्रोटोफोस १० मिली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

------------------

कपाशीची होतेय पाती गळ

तालुक्यात कपाशीचा पेरा वाढला असून, सद्यस्थितीत पिके बहरली आहे. मात्र वातावरण बदलाचा फटका कपाशीला बसला असून, बहरलेल्या कपशीची पाते-फूल गळ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण जास्त व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक पिकांना याचा फटका बसत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.