शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तेल्हारा तालुक्यातील पिकांवर रोगराईचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

तेल्हारा : पावसाचा जोर कमी झाल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीच्या कामांना वेग दिला असून, फवारणीचे कामे ...

तेल्हारा : पावसाचा जोर कमी झाल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीच्या कामांना वेग दिला असून, फवारणीचे कामे सुरू आहेत. वातावरणातील बदलांमुळे तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील शेतशिवारात मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर रोगराईने थैमान घातले असून, कपाशीची फूल-पाती गळ सुरू झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने शेतकरी चिंतित सापडला होता. पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. वातावरणात बदल झाल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद पिकावर रोगराई पसरल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मनात्री, तळेगाव, मनब्दा, दापुरा या खारपाणपट्ट्यात रोगराई वाढल्याने शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. महागडे कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

------------------------

मूग, उडीद या पिकांवर रोगराई वाढली असून, पिकांची नासाडी होत आहे. हाताशी आलेले पीक निघून जात असल्याने चिंता वाढली आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.

- गजानन थोरात, शेतकरी मनात्री बु.

---------------

सध्या उडीद पिकावर मारुका अळी व मावा किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे, शेतकऱ्यांनी दोन्ही किडीचे व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे शिफारशीप्रमाणे मोनॉक्रोटोफोस १० मिली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

------------------

कपाशीची होतेय पाती गळ

तालुक्यात कपाशीचा पेरा वाढला असून, सद्यस्थितीत पिके बहरली आहे. मात्र वातावरण बदलाचा फटका कपाशीला बसला असून, बहरलेल्या कपशीची पाते-फूल गळ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण जास्त व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक पिकांना याचा फटका बसत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.