शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विकासावर हवी चर्चा!

By admin | Updated: December 14, 2015 02:43 IST

परिचर्चेत उमटला सूर; केवळ मोर्चे व सहलीचे अधिवेशन ठरू नये.

अकोला: विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन केवळ मोर्चे आणि सहलीपुरतेच ठरू नये, तर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, असा सूर शनिवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील शेती, सिंचन व इतर विषयासंबंधी विकासाच्या मुद्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे; प्रत्यक्षात मात्र विकासाच्या मुद्यावर पाहिजे त्या प्रमाणात या अधिवेशनात चर्चा होत नाही. अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी कमी असतो, आणि उपलब्ध कमी वेळेत विकासाच्या मुद्यावर हवी तशी चर्चा होत नाही. विकासाच्या दृष्टीने नागपूर येथील विधिमंडळाचे अधिवेशन अपेक्षेप्रमाणे उपयुक्त ठरत नाही. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न आमदारांकडून केले जातात; मात्र विकासाच्या मुद्यांवर हवी तशी भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ मोर्चे आणि लोकप्रतिनिधींच्या सहलीपुरतेच न ठरता, विकासाच्या मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, असे मत विविध राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात विकासावर चर्चा करण्याच्या मुद्याला प्राधान्य दिल्या गेले असते तर, विदर्भातील अनुशेष शिल्लक राहिला नसता, त्यामुळे अधिवेशनात विकासाच्या मुद्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.