शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

मराठी राजभाषेचा वापर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: March 27, 2015 01:25 IST

पर्यावरण विभागाचा इशारा.

खामगाव (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शासन व्यवहारात मराठीचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत असून यापुढे मराठीचा वापर न केल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पर्यावरण विभागाने २५ मार्च रोजी दिला आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापनेनंतर शासनाने मराठीतून राज्य कारभार करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तसेच २६ जानेवारी १९६५ पासून मराठी ही राज्याची राजभाषा म्हणून घोषित केली आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील तरतूदीनुसार सर्व कामकाज मराठीतून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत शासनाकडून वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या. मात्र, असे असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कामकाज १00 टक्के मराठीतून होत नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे याबाबत पर्यावरण मंत्र्यांनीसुध्दा नाराजी व्यक्त केल्यानंतर पर्यावरण विभागाने २५ मार्च रोजी शासन परिपत्रक काढून मराठीचा राज्य कारभारात वापर करण्याबाबत सूचित केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने १८ मे १९८२, १८ जुलै १९८६, भाषा विभागाने १0 मे २0१२, २0 ऑगस्ट २0१४ च्या वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार प्रशासनातील जे अधिकारी व कर्मचारी राजभाषेचा वापर करण्याच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई, गोपनीय अभिलेखात नोंद घेणे, ठपका ठेवणे, एका वर्षाकरिता बढती रोखणे किंवा एक वर्षाकरिता पुढील वेतनवाढ रोखण्याबाबतच्याही सूचना दिल्या होत्या, तरी सुध्दा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे परिपत्रक काढून मराठीतून कामकाजाबाबत ताकीद देण्यात आली आहे.