शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

ऐन दिवाळीच्या तोंडावर व-हाडात ११ शेतकरी आत्महत्या !

By admin | Updated: November 11, 2015 01:08 IST

तीन वर्षांपासून दुष्काळ; दिवाळीला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घरात मात्र अंधार.

विवेक चांदूरकर /वाशिम:तीन वर्षांपासूनचा दुष्काळ आणि शेतमालाला मिळणारे अल्प भाव यामुळे संकटात सापडलेल्या वर्‍हाडातील अकरा शेतकर्‍यांनी हर्षोउल्हासाचा समजल्या जाणार्‍या दिवाळी सणाच्या तोंडावर मृत्यूला कवटाळले. प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीला या शेतकरी कुटुंबांच्या घरात मात्र अंधार आहे. या सर्व आत्महत्या एक ते नऊ नोव्हेंबरदरम्यान झाल्या. वर्‍हाडात गत तीन वर्षांपासून दुष्काळ असून, शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती पार कोलमडली आहे. सण, उत्सव साजरे करणे तर दूरच त्यांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असल्याचे विदारक चित्र आहे. घरी शेती असल्यामुळे दारिद्रय़ रेषेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि शेतीतून एक पैसाही उत्पादन होत नाही. निसर्ग सतत धोका देत असल्याने बळीराजा खचून गेला आहे. दिवाळी सणाच्या पृष्ठभूमिवर आपल्या घरातील दारिद्रय़ाचा अंधार, मुलाबाळांचे फाटलेले कपडे, कुटंबाच्या गरजाही आपण पूर्ण शकत नसल्याचे शल्य त्याला बोचत आहे. हे दु:ख सहन न झाल्यानेच गत आठवड्यात वाशिम, अकोला जिल्ह्यात प्रत्येकी पाच तर बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने या जगातून कायमचा निरोप घेतला.

*यांनी संपविले जीवन..

१) गणेश दुकळे, चिखली, जि. बुलडाणा,२) प्रल्हाद नामदेव गायकवाड (वय ६0) मंगरुळपीर, जि. वाशिम.३) बंडू गोदमले, ढोणी, ता. मानोरा, जि. वाशिम,४) श्रीराम गोविंदराव खिराडे (६0) धनज बु. ता. कारंजा, जि. वाशिम. ५) नामदेव बल्लाळ, गोस्ता, ता. मानोरा, जि. वाशिम.६) अरविंद खडसे मेंद्रा ता. मानोरा, जि. वाशिम ७) संदीप कावरे, भटोरी, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला.८) शंकर राजाराम कुरवाडे, हिवरा बोर्डे, जि. अकोला.९) रोहणा येथील मुळे, १0) निंबा येथील एका शेतकर्‍याचा समावेश आहे. ११)गंगुबाई प्रल्हाद वायकर तेल्हारा,जि.अकोला.