शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्ह्यातील २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST

सचिन राऊत अकाेला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा गतवर्षीच्या काळात वाढलेला हैदाेस कमी करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ॲक्शन ...

सचिन राऊत

अकाेला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा गतवर्षीच्या काळात वाढलेला हैदाेस कमी करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ॲक्शन प्लानच तयार केला आहे. या गुन्हेगारांचे कंबरडे माेडून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र झाेपडपट्टीदादा नियंत्रण कायदा एमपीडीए तसेच जिल्ह्याच्या बाहेर थेट दाेन वर्षांसाठी हद्दपारीच्या कारवाईचे अस्त्र उगारले आहे. त्यानुसार गत ८ महिन्याच्या कालावधीत तब्बल २६ टाेळ्यांना हद्दपार करण्यात आले असून, ९ गुंडांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.

राजकीय पदाधिकारी यांचे पाठबळ असल्याने शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी टाेळ्यांचे वर्चस्व माेठ्या प्रमाणात सुरू झाले हाेते. या टाेळ्यांनी माेठे भूखंड वादग्रस्त करीत त्यावर ताबा मिळवणे, घर खाली करणे यासह खंडणी, जबरी वसुली करणे, व्यापारी व उद्याेजकांना धमकावण्याचे प्रकार प्रचंड वाढले हाेते. या प्रकरणाच्या तक्रारी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी कशाचीही हयगय न करता गुन्हेगारी टाेळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी कारवाईचा धडाकाच लावला आहे. त्यानुसार अकाेला पाेलीस दलाने कधी नव्हे; एवढ्या माेठ्या कारवाया केलेल्या आहेत. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रूजू झाल्यानंतर २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली असून, यामधील गुन्हेगारांचा आकडा हा तब्बल १००च्या वर असल्याची माहिती आहे, तर झाेपडपट्टीदादांना त्यांची जागा दाखविण्यासाठी एमपीडीएच्या कारवाया करून त्यांनाही पळता भुई थाेडी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टाेळ्यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती आहे. थेट दाेन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपारी, एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबध्दता आणि एमपीडीएच्या कारवायांचा सपाटा सुरू असल्याने गुन्हेगारांनी त्यांचे मार्ग बदलल्याचे वास्तव आहे.

जुने शहरातील टाेळीवर एसपींचा वाॅच

जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडांच्या टाेळ्या गत काही दिवसांपासून सक्रीय झाल्या आहेत. त्यांच्यावर खुद्द पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचाच वाॅच असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पाेलीस अधीक्षक या टाेळीचेही कंबरडे माेडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जुने शहरातील या टाेळीचा हैदाेस लक्षात घेता पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा पीडितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

९ प्रकरणात एमपीडीएचे अस्त्र उगारले

पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रूजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या सर्वाधिक एमपीडीएच्या कारवाया केलेल्या आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी त्यांनी एमपीडीएच्या ९ कारवाया केल्या असून, यासाेबतच गुंडांच्या २६ टाेळ्या जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करून गुन्हेगारांची हयगय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

आणखी दाेन टाेळ्या हद्दपार

रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणाऱ्या दाेन टाेळ्या बुधवारी हद्दपार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नीलेश विजय बाेरकर (रा. नवीन तारफैल) आणि पियुष पंढरीनाथ माेडक (रा. देशमुख फैल) या दाेघांच्या टाेळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. रामदास पेठ पाेलिसांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दाेन्ही टाेळ्यांना हद्दपार करण्याचा आदेश बुधवारी दिला.