शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये डेंग्यू, जलजन्य आजारांचे थैमान

By admin | Updated: October 29, 2014 01:47 IST

१५ जणांचा मृत्यू, १00 वर रुग्ण पॉझिटिव्ह.

सचिन राऊत/अकोला

         वातावरणातील बदल आणि साचलेल्या पाण्यामध्ये झालेल्या डासांच्या उत्पत्तीने जिल्ह्यातील तब्बल २४७ गावांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश आजार आणि जलजन्य आजारांचे थैमान माजले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाने या गावांची तपासणी केली असून, ही सर्व गावे ह्यरेड झोनह्णमध्ये टाकण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील २४७ गावांत डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत जवळपास १५ जणांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये १00 हून अधिक रुग्णांच्या तपासणीत डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा प्रचंड उद्रेक झाला असताना आरोग्य विभागाने कागदोपत्रीच उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण भागात डास प्रतिबंधक धूरळणी व ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नसून, शहरातही प्रचंड घाण साचली आहे. या दोन्ही बाबींच्या परिणामी डासांची प्रचंड प्रमाणात उत्पत्ती होत असून, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. दरम्यान, २४७ गावांतील प्रत्येक दोन ते तीन घरांमागे एक डेंग्यूचा रुग्ण आढळून येत आहे. त्यामूळे अकोला शहर, आकोट व तेल्हारा तालुका आणि बाळापूर शहर ह्यरेड झोनह्णमध्ये टाकण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, तर नागरिकांनीही आपल्या घराच्या आजूबाजूला कचरा केला. गवत व इतर कचर्‍यामूळे डासांचे प्रमाण वाढत असून, परिणामी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. डासांपासून बचाव करण्याची गरज असून, आरोग्य विभागासोबतच नागरिकांनी साफसफाई ठेवल्यास या आजारावर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डेंग्यू आणि डेग्यूसदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. यामधील बहुतांश रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळत असून, काहींना मात्र केवळ साधा ताप असल्याचेही समोर येत आहे डेंग्यू तापासोबतच व्हायरल ताप आणि अँलजिर्क तापाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामूळे ताप किंवा शरीरावर कुठेही सूज आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा अवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांनी केले आहे.