शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

--------------------- पथदिवे सुरू करण्याची मागणी पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांत रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत ...

---------------------

पथदिवे सुरू करण्याची मागणी

पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांत रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन पथदिवे सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

------------------------

बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग

बाळापूर : शहरातील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा तुंबल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

--------------------

ग्रामपंचायत इमारती झाल्या शिकस्त

अकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. याच शिकस्त इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन ग्रामपंचायतींची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

------------------

सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

बाळापूर : गत आठवड्यात सतत पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील खिरपूरी, टाकळी खुरेशी, व्याळा, देगाव, नांदखेड शिवारात सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

------------------

लोणाग्रा परिसरात रस्त्यावर सांडपाणी

आगर : येथून जवळच असलेल्या लोणाग्रा ग्रामपंचायतकडून नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीज पुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त आहेत.

--------------------

बँकांकडून खरीप पीककर्ज वाटप संथगतीने

अकोला : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही ग्रामीण भागातील बँकांत पीककर्ज वाटपाचा वेग संथ आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असून, तातडीने पीककर्ज वाटप करणे गरजेचे आहे.

-----------------------

नांदखेड येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

बाळापूर : तालुक्यातील नांदखेड येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.

----------------------------------------

लोणाग्रा-हातरून रस्त्याची अवस्था वाईट

अकोला : लोणाग्रा ते हातरूण या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून, रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामनाकरीत मार्ग काढावा लागत आहे.

पावसामुळे अडचणी वाढल्या असून, रस्त्याची दुरुस्तीची मागणी होत आहे.

---------------------------------

वीजवाहिनीमुळे अपघाताचा धोका

तेल्हारा : तालुक्यातील ग्रामीण भागांत काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीजवाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर आहे. एखादवेळी वादळवाऱ्याने ही वाहिनी तुटल्यास धोका आहे.

-------------------------------------

फलकाअभावी चालकांची दिशाभूल

रोहणखेड : रोहणखेड ते अकोट मार्ग हा वळण मार्ग असल्याने या मार्गावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे चालकांत संभ्रम निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.