शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

--------------------- पथदिवे सुरू करण्याची मागणी पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांत रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत ...

---------------------

पथदिवे सुरू करण्याची मागणी

पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांत रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन पथदिवे सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

------------------------

बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग

बाळापूर : शहरातील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा तुंबल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

--------------------

ग्रामपंचायत इमारती झाल्या शिकस्त

अकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. याच शिकस्त इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन ग्रामपंचायतींची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

------------------

सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

बाळापूर : गत आठवड्यात सतत पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील खिरपूरी, टाकळी खुरेशी, व्याळा, देगाव, नांदखेड शिवारात सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

------------------

लोणाग्रा परिसरात रस्त्यावर सांडपाणी

आगर : येथून जवळच असलेल्या लोणाग्रा ग्रामपंचायतकडून नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीज पुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त आहेत.

--------------------

बँकांकडून खरीप पीककर्ज वाटप संथगतीने

अकोला : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही ग्रामीण भागातील बँकांत पीककर्ज वाटपाचा वेग संथ आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असून, तातडीने पीककर्ज वाटप करणे गरजेचे आहे.

-----------------------

नांदखेड येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

बाळापूर : तालुक्यातील नांदखेड येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.

----------------------------------------

लोणाग्रा-हातरून रस्त्याची अवस्था वाईट

अकोला : लोणाग्रा ते हातरूण या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून, रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामनाकरीत मार्ग काढावा लागत आहे.

पावसामुळे अडचणी वाढल्या असून, रस्त्याची दुरुस्तीची मागणी होत आहे.

---------------------------------

वीजवाहिनीमुळे अपघाताचा धोका

तेल्हारा : तालुक्यातील ग्रामीण भागांत काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीजवाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर आहे. एखादवेळी वादळवाऱ्याने ही वाहिनी तुटल्यास धोका आहे.

-------------------------------------

फलकाअभावी चालकांची दिशाभूल

रोहणखेड : रोहणखेड ते अकोट मार्ग हा वळण मार्ग असल्याने या मार्गावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे चालकांत संभ्रम निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.