शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बाजारपेठेत व्यवहार मंदावले

By admin | Updated: August 18, 2014 23:42 IST

पाऊस लांबल्याचा परिणाम

मोताळा : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मोताळा परिसरात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या प्रचंड गारपिटीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. रब्बी हंगाम हातातून गेल्यानंतर खरिपाची आशा असताना पावसाळा उलटण्याच्या मार्गावर आहे, परंतु एकदाही जोरदार पाऊस न झाल्याने पावसाअभावी कोमात गेलेल्या कोवळय़ा पिकांच्या होत असलेल्या नुकसानीमुळे बाजारपेठेतील व्यवहार सुस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. मोताळा तालुक्यात २२ जुलैची रात्र व २३ जुलैचा दिवसभराचा रिमझिम असा फक्त एकदाच पाऊस पडला आहे. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर पडलेल्या रिमझिम पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली. उगवून आलेली कोवळी पिके पावसाअभावी सुकू न जात आहे. पाऊस नसल्याने हिरवळ दिसत नसून जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळा उलटण्याच्या मार्गावर असतानासुद्धा शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसावरच सर्व व्यवहार अवलंबून असल्याने बाजारपेठेतही मंदी आल्याचे पाहावयास मिळत आहे. मोताळासह परिसरात हॉटेल्स, दवाखाने, किराणा, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, मोबाईल शॉपी, मोटारसायकल शोरूम, कापड दुकाने, कृषी केंद्र, कृषी उत्पन्न बाजार, बँका, एटीएम, शाळा, कॉलेज आदी सुविद्या मोताळय़ामध्ये आहेत. परंतु बाजारपेठ शेतकरी वर्गावर अवलंबून आहे. मागील काही महिन्यात अवकाळी पावसासह वादळ वार्‍यासह झालेल्या प्रचंड गारपिटीत तालुकाभरातील शेतकर्‍यांचे सात हजार हेक्टरच्यावर क्षेत्र बाधित होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतीमालाचे झालेले नुकसान, उशिरा झालेल्या पेरण्या व आता लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातात शिल्लक काही राहिलेले नाही. त्यामुळे राखून ठेवलेला पैसा खर्च झाला असून, थोड्याफार प्रमाणात शिल्लक असलेला पैसा खर्च करण्यात शेतकरी उदासीनता दाखवत आहे. परिणामी व्यापारी वर्गाला ग्राहकांची वाट पाहत दिवस काढावा लागत आहे. नवीन पीक हातात येईपर्यंत शेतकरी जवळचा पैसा राखून ठेवत असतो. मात्र तालुक्यात रब्बीच्या हंगामानंतर खरिपातसुद्धा पावसाने शेतकर्‍यांचा छळ सुरू केलेला दिसत असल्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला. परिणामी शेतकर्‍यांचे सर्व नियोजन कोलमडले आहे. पावसाअभावी मजुरांच्या हाताला काम नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकदाही समाधानकारक पाऊस आजपर्यंत झाला नाही. दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे भाजीपाल्यासह आवश्यक जीवनोपयोगी वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकदेखील बाजारात खरेदी करण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे. एरवी सकाळपासून रात्री साडेनऊपर्यंंत गर्दी असलेल्या बाजारपेठेत यावर्षी दिवसभर शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे विविध व्यवसायांवर मंदीचे सावट आहे.