शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

पातूर नगर परिषदेचे फलक मराठीसोबत उर्दूमध्ये लावण्याचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी केला अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

याबाबतचा ठराव नगर परिषदेमधील सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेस व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत एकूण ११ सदस्यांनी बहुमताने १६ ...

याबाबतचा ठराव नगर परिषदेमधील सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेस व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत एकूण ११ सदस्यांनी बहुमताने १६ फेब्रुवारीला मंजूर करून कायम केला. त्यामुळे हा ठराव गैरकायदेशीर असून, मराठी राजभाषेच्या शासन निर्णयाविरुद्ध असल्यामुळे तो रद्द करावा, पातूर शहरांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक असल्यामुळे मराठीसाेबतच उर्दू भाषेमध्ये फलक लावल्यास शहरातील इतरही भाषिक त्यांच्या भाषेमध्ये नाव लिहिण्याची मागणी करतील. त्यामुळे पातूर शहरामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे प्रकरण नगरसेविका वर्षा बगाडे यांनी महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक वसाहती अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार प्रकरण दाखल केले होते. पातूर नगर परिषद कार्यालयाचे नाव मराठी भाषेसाेबतच उर्दू भाषेतसुद्धा लावावे, या बाजूने नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, सय्यद बुरहान सय्यद नबी, सय्यद मुजाहिद इकबाल सय्यद मोहसीन, मोहम्मद एजाज मोहम्मद तालेब, सय्यद एहसानोद्दीन सय्यद ग्यासोद्दीन, हिदायतखान रूमखान, मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद, हमीदाबी हुसेन शहा, तमीजाबी मोहम्मद शफी, रेहाना परवीन शेख अश्पाक, हकीमाबी सय्यद शेर अली, रूपाली सुरवाडे यांनी या ठरावाला बहुमताने पारित केले होते. मराठी भाषेबरोबर उर्दू भाषेमध्ये नाव देण्याचा ठराव रद्दबातल करण्याचा वर्षा बगाडे नगरसेविका पातूर यांचा अर्ज मंजूर केला आहे. बगाडे यांची बाजू ॲड. गजानन भोपळे यांनी मांडली.

------------काेट-----

उर्दू किंवा इतर सर्व भाषेविषयी मनात आदर आहे; मात्र पातूर शहरात विविध जाती-धर्माचे विविध भाषिक नागरिक राहतात. त्यामुळे इमारतीवर मराठीसाेबतच उर्दू भाषेत नाव टाकण्याचा ठराव पारित केल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता हाेती. त्यामुळे हा ठराव रद्दबातल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती.

वर्षा संजय बागडे, नगरसेविका, पातूर

--------------

शासन निर्णय काय म्हणताे?

महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिक राज्य आहे. शासन व्यवहारात राज्यभाषा मराठीचा वापर होणे आवश्यक आहे. शासन निर्णय १९८३ व शासन परिपत्रके ७ मे २०१८ व ३१ जानेवारी २०२० अन्वये काढण्यात आले आहे. शासन परिपत्रक ७ मे २०१८ मधील सर्वसाधारण सूचना क्रमांक ६ नुसार शासकीय कार्यालयात लावलेल्या पाट्या, फलक मराठीतून असावेत तसेच शासकीय कामकाजात पत्रव्यवहारांमध्ये, निमंत्रणपत्रिकेमध्ये व इतर बाबीसंदर्भात, रेल्वेस्थानके, गावाची नावे यांच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत देवनागरी लिपीत नावे लिहावीत, अशा सूचना आहेत.

----------------------------