शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीसाठी पॅनकार्डचा निर्णय अव्यवहार्य

By admin | Updated: March 20, 2015 01:11 IST

परिचर्चेतील सूर ; शेतकरी-सराफा व्यावसायिकांना येऊ शकतात अडचणी.

अकोला : सोने-चांदीचे दागिने खरेदी करताना एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या व्यवहारासाठी पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या अर्थ व वित्त विभागाने तशा स्वरूपाचे पत्र जारी केले. यादरम्यान सोने, चांदी खरेदी-विक्रीचा सर्वाधिक व्यवहार प्रामुख्याने शेतकरी वर्ग करीत असला तरी शेतातील उत्पादनाच्या अनिश्‍चिततेमुळे शेतकर्‍यांकडे पॅनकार्ड उपलब्ध नाहीत. यामुळे शेतकर्‍यांसह सराफा व्यावसायिकांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. शिवाय पॅनकार्ड नसेल तरीही पळवाटा असल्याने शासनाचा हा निर्णय अव्यवहार्य असल्याचे मत गुरुवारी ह्यलोकमतह्णने आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटले. सोने, चांदीच्या उलाढालीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने एक लाख रुपये किमतीपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास संबंधिताला पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले. विदर्भात सोने खरेदी करणे किंवा गहाण ठेवण्याचे सर्वाधिक व्यवहार शेतकरी वर्ग करीत असल्याचा सराफा व्यावसायिकांचा दावा आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी शेती व त्याकरिता होणार्‍या आर्थिक व्यवहारासाठी शेतकरी सोने गहाण ठेवतात. शेती उत्पादन शाश्‍वत व निश्‍चित नसल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांकडे पॅन कार्ड उपलब्ध नाहीत. सोने, चांदीचा बाजार शेतकर्‍यांच्या उलाढालीवर अवलंबून असल्याने सराफा व्यवसायिकांची मात्र कुचंबणा झाल्याचे मत परिचर्चेत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले. पॅनकार्ड नसेल व सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा होत असेल तर पॅर्नकार्डला पर्याय म्हणून आयकर विभागाचा ६0 व ६१ क्रमांकाचा अर्ज भरून देणे अत्यावश्यक असण्यावरही परिचर्चेत प्रकाशझोत टाकण्यात आला. ही प्रक्रिया संबंधित ग्राहकासाठी त्रासदायक ठरणार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. शिवाय एक लाखापेक्षा कमी किमतीचा व्यवहार दाखवण्यासाठी पळवाटांचा वापर होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी शहरातील सराफा व्यावसायिकांकडे सोने गहाण ठेवतात. याबदल्यात त्यांना पैसे मिळत असले तरी ठेव सुरक्षित असल्याची भावना आजही कायम आहे, परंतु शासनाच्या निर्णयांमुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. साहजिकच याचा परिणाम सराफा बाजारावर होणार असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. परिचर्चेत भाजपच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सराफ, सचिव प्रकाश लोढिया, सेवानवृत्त आयकर अधिकारी शालीग्राम वारूळकर, सराफा व्यावसायिक शैलेश खरोटे, राजकुमार वर्मा, शेतकरी राजू पाटील यांनी सहभाग घेतला.