शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कर्जमाफीचा गाजावाजा; पीक कर्ज वाटपाचा बोजवारा

By admin | Updated: July 4, 2017 02:48 IST

जिल्ह्यात केवळ २६ टक्के कर्ज वाटप

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले, तरी १५ जूनपर्यंत केवळ ३१४ कोटी ९८ लाख रुपये (२६ टक्के ) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा गाजावाजा करण्यात येत असताना, दुसरीकडे पीक कर्ज वाटपाचा बोजवारा उडाला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. त्यानुसार गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला, खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत गत १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार ३२७ शेतकऱ्यांना केवळ ३१४ कोटी ९८ लाख रुपये (२६.२३ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. उर्वरित ७४ टक्के पीक कर्जाचे वाटप अद्याप बाकी आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली. यासंदर्भात गत २८ जून रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. एकीकडे कर्जमाफीचा गाजावाजा सुरू असताना, दुसरीकडे खरीप पेरण्या सुरू झाल्या तरी; जिल्ह्यात केवळ २६.२३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, खरीप पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकांकडून असे करण्यात आले कर्ज वाटप!गत १५ जूनपर्यंत जिल्ह्यात बँकांमार्फत ३९ हजार ३१२७ शेतकऱ्यांना ३१४ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत ३२ हजार ५१ शेतकऱ्यांना २९३ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये, राष्ट्रीयीकृत बँकांकडून ४ हजार ३९१ शेतकऱ्यांना ४२ कोटी ८३ लाख रुपये, खासगी बँकांकडून ६७३ शेतकऱ्यांना ११ कोटी २८ लाख रुपये आणि ग्रामीण बँकेकडून २ हजार २१२ शेतकऱ्यांना २१ कोटी २७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह!खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येते; मात्र खरीप पेरण्या सुरू झाल्या, तरी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत करण्यात आलेल्या कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.