शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची छाया गडद!

By admin | Updated: October 9, 2015 02:01 IST

शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आज बुलडाण्यात.

खामगाव : गत तीन वर्षांंपासून सातत्याने ओल्या व कोरड्या अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यात कृषिमाल उत्पादनातील घट, चार हंगामांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना बसलेला फटका आणि अवर्षणसदृश स्थितीत बुलडाण्यात शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा पाहता, जिल्ह्यात दुष्कळसदृश स्थि तीची छाया गडद झाली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकरी आत्महत्या हा विषय केंद्रस्थानी ठेवून कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बुलडाण्यात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पंधरा वर्षांंमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा सुमारे १६00 वर पोहोचला असताना जिल्ह्यातील कृषी, सिंचन, मत्स्य, वैरण विकास यांसह अन्य विभागांची एकत्रित बैठक घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या जिल्ह्यातील अँक्शन प्लॅनवर साधकबाधक चर्चा होतेय. एकीकडे जलचक्रातील अनियमितता शेतकर्‍यांना मारक ठरत आहे. गेल्या तीन वर्षांंपासून हवामानाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना धोका दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये बैठक घेत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, शिक्षण विभाग, कृषीसह संबंधित खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात ८ ऑक्टोबरला दिवसभर धावपळ होती. जिल्ह्यातील शे तकरी आत्महत्या रोखण्यासाठी बनविण्यात आलेल्या अँक्शन प्लॅनच्या अनुषंगाने येत्या काळात करण्यात येणार्‍या उपायोजनांचा आराखडा बनविण्यात अधिकारी वर्ग व्यस्त होता. पश्‍चिम विदर्भात बुलडाण्याची स्थिती बिकट असून, सिंचनाचा पाच हजार कोटींचा अनुशेष पाहता, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होतो का, याकडे लक्ष लागून आहे.