शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

अतिवृष्टीच्या तडाख्यात १०५४२ हेक्टरीवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

अकोला : पाऊस, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १० हजार ५४२ ...

अकोला : पाऊस, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गुरुवार ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

जिल्ह्यात ६ सप्टेंबरपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामध्ये सोमवार, ६ सप्टेंबर रोजी रात्री जिल्ह्यात धो धो पाऊस बरसला असून, मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागात नदी व नाल्यांना पूर आला असून, शेतातील पिके पावसाच्या पाण्यात बुडाली. खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात १० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यानुसार पाऊस आणि अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १० हजार ५४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

तालुकानिहाय पीक नुकसानीचा

असा आहे प्राथमिक अंदाज!

तालुका नुकसान (हेक्टर)

अकोला ३,२७२

अकोट २,६४७

तेल्हारा ३,४००

बाळापूर ८२०

मूर्तिजापूर ४४३

........................................................

एकूण १०,५४२

............................................................

३७६ घरांची पडझड;

१,४३० व्यक्ती बाधित!

अतिवृष्टी व पावसामुळे ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात बाधित ५७ गावांमध्ये ३७६ घरांची पडझड झाली. त्यामध्ये काही घरांचे अंशत: तर काही घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, १ हजार ४३० व्यक्ती बाधित झाले. अतिवृष्टी व पुराच्या कालावधीत जिल्ह्यात सात व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

.......................

‘या’ पिकांचे झाले नुकसान!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

.....................................

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त अहवालानुसार ६ ते ९ सप्टेंबरपर्यत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी