शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

बाबाे! कापशी तलावाची २०० एकर जागा गावकऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत ...

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत बिडाच्या पाइपलाइनद्वारे पाणी आणल्यावर नेहरु पार्क येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जात हाेती. कालांतराने शहराची भविष्यातील लाेकसंख्या विचारात घेता काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा आरक्षित करण्यात आला. त्यामुळे कापशी तलावाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेऊन पाण्याचा उपसा बंद झाला. २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर राेकडे यांनी कापशी ते अकाेला शहरापर्यंतची बिडाची जलवाहिनी काढून घेत या तलावातून हाेणारा संभाव्य पाणीपुरवठा कायमचा बंद केला. त्यानंतर या प्रकल्पाकडे प्रशासनाने पाठ फिरवली.

डाॅ.रणजित पाटील यांच्याकडून निधी

शहरवासीयांसाठी निसर्गरम्य पर्यटनस्थळाची निर्मिती करण्याच्या उद्देशातून तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी मनपा प्रशासनाला सुमारे ३ काेटींचा निधी उपलब्ध करुन दिला हाेता. या निधीतून मनपाने रस्ता व इतर कामे प्रस्तावित केली हाेती. ही कामे पूर्ण झाल्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले.

२०० एकर जमिनीवर लागवड

कापशी तलाव ७०० एकर जागेत असून त्यापैकी तब्बल २०० एकर जमिनीवर स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. जमिनीवर साेयाबीन, मूग, उडिद,कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. मनपाने ७२ जणांना सात दिवसांची नाेटीस दिली असली तरी शेतातील पिके पाहता अतिक्रमणधारक जमिनीवरचा ताबा कसा साेडतील, याकडे लक्ष लागले आहे.

मनपाच्या मालकीच्या जमिनीवर उभारण्यात आलेले अतिक्रमण निश्चितच हटविल्या जाईल. याठिकाणी चांगल्या दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित केल्यास कापशी गावाची भरभराट हाेइल,यात दुमत नाही. तसेच निसर्गप्रेमी,लहान मुले, नागरिकांना पर्याय उपलब्ध हाेइल.

- निमा अराेरा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त