शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

बाबाे! कापशी तलावाची २०० एकर जागा गावकऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत ...

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत बिडाच्या पाइपलाइनद्वारे पाणी आणल्यावर नेहरु पार्क येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जात हाेती. कालांतराने शहराची भविष्यातील लाेकसंख्या विचारात घेता काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा आरक्षित करण्यात आला. त्यामुळे कापशी तलावाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेऊन पाण्याचा उपसा बंद झाला. २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर राेकडे यांनी कापशी ते अकाेला शहरापर्यंतची बिडाची जलवाहिनी काढून घेत या तलावातून हाेणारा संभाव्य पाणीपुरवठा कायमचा बंद केला. त्यानंतर या प्रकल्पाकडे प्रशासनाने पाठ फिरवली.

डाॅ.रणजित पाटील यांच्याकडून निधी

शहरवासीयांसाठी निसर्गरम्य पर्यटनस्थळाची निर्मिती करण्याच्या उद्देशातून तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी मनपा प्रशासनाला सुमारे ३ काेटींचा निधी उपलब्ध करुन दिला हाेता. या निधीतून मनपाने रस्ता व इतर कामे प्रस्तावित केली हाेती. ही कामे पूर्ण झाल्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले.

२०० एकर जमिनीवर लागवड

कापशी तलाव ७०० एकर जागेत असून त्यापैकी तब्बल २०० एकर जमिनीवर स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. जमिनीवर साेयाबीन, मूग, उडिद,कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. मनपाने ७२ जणांना सात दिवसांची नाेटीस दिली असली तरी शेतातील पिके पाहता अतिक्रमणधारक जमिनीवरचा ताबा कसा साेडतील, याकडे लक्ष लागले आहे.

मनपाच्या मालकीच्या जमिनीवर उभारण्यात आलेले अतिक्रमण निश्चितच हटविल्या जाईल. याठिकाणी चांगल्या दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित केल्यास कापशी गावाची भरभराट हाेइल,यात दुमत नाही. तसेच निसर्गप्रेमी,लहान मुले, नागरिकांना पर्याय उपलब्ध हाेइल.

- निमा अराेरा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त