शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 20:16 IST

Murtizapur News : १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील महावितरणच्या  माना उपविभाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतू माना सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या माना गावातील १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.             माना सबस्टेशन अंतर्गत वीज तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून तारे जवळची जागा मोकळी करण्याचा कार्यक्रम चालू असताना त्यांनी तसे न करता मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या न छाटता शंभर - दोनशे वर्षापूर्वीचे   चार कडूनिंबाचे झाडे बुडापासून जमिनदोस्त केली आहे. शासन एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम युध्दस्तरावर राबवित असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनापरवाना महाकाय महाकाय वृक्षाची कत्तल करण्यात येत असल्याने गावकऱ्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात माना वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कमलेश मस्के यांना व मूर्तिजापूर येथील उपकार्यकारी अभियंता मनोज खांडरे यांना यासंदर्भात अवगत केले असता आम्ही घटनास्थळावर जावून पाहीले नाही व झाडे बुडापासून तोडल्याची आपल्याला कल्पना नसल्याचे लोकमतशी बोलताना सांगून कानावर हात ठेवले. वास्तविक मान्सूनपूर्व नियोजन म्हणून झाडाच्या फांद्या छाटने अपेक्षित असताना त्यांच्या कडून संपूर्ण झाडाची कत्तल होत असल्याने माना येथील उपसरपंच मंगेश वानखडे यांनी तहसीलदार मूर्तिजापूर व पोलीस स्टेशन माना येथे वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुठलीही परवानगी न घेता झाडाची कत्तल करणे गंभीर बाब असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे. मान्सूनपूर्व तयारी करताना आम्ही झाडे बुडापासून कधीच तोडत नाही. केवळ झाडाच्या फांद्या छाटल्या जातात. असे झाले असेल तर त्याची चौकशी करु.

-मनोज खांडरेउपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, मूर्तिजापूर --सदर विभागाने ग्रामपंचायत ची आणि वनविभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते.तलाठी,मंडळ अधिकारी यांचा पंचनाम्यासह अहवाल मागवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल.

-प्रदीप पवार तहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :mahavitaranमहावितरणMurtijapurमुर्तिजापूर