शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

संचारबंदी कागदावरच; रस्त्यांवर मुक्त संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा कहर रोखण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानुसार अत्यावश्यक सेवा ...

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा कहर रोखण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानुसार अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, कडक निर्बंधांचे पालन करत व्यापाऱ्यांकडून इतर दुकाने बंद ठेवण्यात आली; मात्र शहरातील बाजार परिसरासह इतर प्रमुख रस्ते व चौकांमध्ये नागरिकांची गर्दी कायम असून, संचारबंदी कागदावरच असल्याचे वास्तव गुरुवारी अकोला शहरात पाहायला मिळाले.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनामुळे मृत्यूंची वाढती संख्या लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने राज्यभरात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत ‘लाॅकडाऊन’ घाेषित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १४ एप्रिल रोजी दिला. त्या अनुषंगाने रुग्णालये, निदान केंद्रे, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, लसीकरण, पशुवैद्यकीय सेवा, किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने, दूध विक्री केंद्र, बेकरी, मिठाई व सर्वप्रकारची खाद्याची दुकाने, पेट्रोल पंप, सार्वजनिक वाहतूक सेवा, आदी अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने संचारबंदीत बंद ठेवण्यात आली. संचारबंदीचे पालन करत अकोला शहरात व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली, तरी शहरातील बाजारपेठ आणि प्रमुख चाैकांमध्ये रस्त्यांवरील नागरिकांचा राबता मात्र कायम आहे. रस्त्यावर नागरिकांची होणारी गर्दी कायम असल्याने प्रशासनामार्फत लागू करण्यात आलेली संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र आहे.

शहरात असे आढळले वास्तव!

अकोला शहरातील जनता बाजार, न्यू क्लाॅथ मार्केट, जुना कापड बाजार, गांधी रोड, टिळक रोड, सराफा बाजार, चांदेकर चौक ते फतेह चौक आदी भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. परंतु, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी कायम असल्याचे पाहायला मिळाले.

बाहेरुन बंद; आतून सुरु!

संचारबंदी दरम्यान शहरातील काही भागात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही दुकानांचे अर्धे शटर बंद व अर्धे शटर उघडण्यात आले होते. त्यामुळे शहरात काही दुकाने बाहेरुन बंद दिसत असली, तरी आतून मालाची ग्राहकांना विक्री सुरु असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणे टाळावे. अन्यथा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, या संदर्भात पोलीस व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.

राऊतवाडीत भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची गर्दी

राऊतवाडी, जठार पेठ चौक, उमरी रोड, सातव चौकसह शहरातील रणपिसे नगर, जवाहर नगर चौक, गोरक्षण रोड परिसरातील इन्कमटॅक्स चौक, संत तुकाराम चौक, सिंधी कॅम्प, खदान, कौलखेड रोड, आदी ठिकाणी भाजी विक्रीसह किराणा दुकाने, हार्डवेअरची दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. संचारबंदीकडे कानाडोळा करत, नागरिक रस्त्यांवर गर्दी करत असल्याचे चित्र गुरूवारी पाहायला मिळाले.

फोटो: