शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

संचारबंदीचा भाजीबाजाराला फटका; उलाढाल निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आठवडी बाजार बंद आहे. भाजीपाला बाजारालाही वेळेचे ...

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आठवडी बाजार बंद आहे. भाजीपाला बाजारालाही वेळेचे निर्बंध आहे. त्याचे परिणाम भाजी बाजारात पाहायला मिळत आहे. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दररोज केवळ १००-१२० क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात संचारबंदी असल्याने सर्वच व्यवसायावर निर्बंध आले आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील व्यापारी येथील भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात; मात्र ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळत नाही. परिणामी, शेतकरी हैराण झाला आहे. शहरातील भाजी बाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. शहरात भाजीपाला फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही सकाळी ७ ते ११ पर्यंत वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

दर चांगला मिळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही किंवा माल काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून माल घेऊन येऊ का, असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही, असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचे करायचे काय, या विचाराने शेतकरी चिंतित आहे.

--बॉक्स--

शुक्रवारचे होलसेल दर किलोमध्ये

वांगी - १० ते १२ रुपये

टोमॅटो - १२ ते १५ रुपये

भेंडी - १२ ते १५ रुपये

कारले - १५ ते १८ रुपये

गवार - २५ ते ३० रुपये

हिरवी मिरची - २० ते २५ रुपये

काकडी - १२ ते १५ रुपये

हिरवा कांदा - २० ते २५ रुपये

कांदा - १२ ते १५ रुपये

बटाटा - १० ते १५ रुपये

लसूण - ४० ते ६० रुपये

--बॉक्स--

भाजीपाला फेकून देण्याची वेळ

जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतमालाची उलाढाल ठप्प झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर भाजीपाला बाजारपेठेत न आणता शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे.

--बॉक्स--

चार तासांत विक्री होणार तरी किती?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमध्ये भाजीपाला विक्रीला केवळ चार तास मिळत आहे. त्यामुळे या वेळात भाजीपाला विक्री होणार तरी किती, असा प्रश्न निर्माण होत आहे. या वेळेच्या निर्बंधांमुळे भाजीपाला विक्री कमी होत आहे. त्यामुळे व्यापारीही माल घेण्यास तयार नाही.

--कोट--

कोरोनामुळे आठवडी बाजार बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

अनंता चिंचोळकर, व्यापारी

--कोट--

शेतात कोबी, टमाटर पडलेले आहे. बाजारात दर नसल्याने मालाचा खर्चही निघत नाही. संचारबंदीमुळे आता भाजीपाल्याचा दर वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे.

- दामोदर बर्डे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, देऊळगाव