शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: July 29, 2014 20:16 IST

नद्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील गौतमा, पूर्णा व विद्रुपा नदीकाठच्या लोकांना त्याची झळ पोहचली असून, ४ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

तेल्हारा: संततधार पावसानंतर नद्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील गौतमा, पूर्णा व विद्रुपा नदीकाठच्या लोकांना त्याची झळ पोहचली असून, ४ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले. संततधार पावसामुळे तालुक्यातील गौतमा, आस, विद्रुपा, पूर्णा या नद्यांसह नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमधील नवांकुरित पिकांचे मोठे नुकसान झाले. अडगाव, मालठाणा, बेलखेड, पाथर्डी, तेल्हारा बु. , कोठा, भांबेरी, खापरखेड, पिवंदळ, सांगवी, नेर, खेल सटवाजी, खेल कृष्णाजी, दापुरा, उमरी, खाकटा, खेल देशपांडे, उबारखेड, मनात्री खुर्द, मनात्री बु., तळेगाव डौला, तळेगाव पातुर्डा, आडसुळ, बांबर्डा या गावांमधील नदीकाठच्या शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मनात्री, मालपुरा व तेल्हारा येथील काही जणांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. तालुक्यातील चार हजार हेक्टर जमिनीवरील कपाशी, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. निंभोरा खुर्द व हिंगणी बु. येथील नदीवरील पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. पीक नुकसानीचा सर्व्हे येत्या दोन दिवसांत होणार आहे. शासनाने नुकसानीची मदत त्वरित जारी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.