शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीत गोंधळ; पराभूत उमेदवारांचा ‘एल्गार’!

By admin | Updated: February 25, 2017 02:23 IST

फेरमतदान घेण्याची मागणी; कलेक्टर बंगल्यावर धडक

अकोला, दि. २४- महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, भाजप वगळता विविध राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी एल्गार पुकारला. राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी शुक्रवारी कलेक्टर बंगल्यावर धडक देऊन, मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रियेत ईव्हीएममध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले, असा आरोप करीत, निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीतील गोंधळाविरुद्ध ह्यएल्गार पुकारला. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी बंगल्यावर धडक देत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीत झालेला निर्णय अमान्य असून, ईव्हीएम ताब्यात घेऊन ह्यसीलह्ण करण्यात याव्या व यासंदर्भात सखोल चौकशी करून महानगरपालिका निवडणुकीसाठी मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, मदन भरगड, अविनाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार मुलचंदाणी, भारिप-बमसंचे बालमुकुंद भिरड, बुद्धरत्न इंगोले, वंदना वासनिक, शिवसेनेचे तरुण बगेरे, नंदू ढोरे, नकुल ताथोड, प्रल्हाद ढोरे यांच्यासह पराभूत उमेदवार उपस्थित होते.एका उमेदवाराला एकच मत; दुसर्‍याला केवळ २0 मते!महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्र.१३ मध्ये उमेदवार नंदू ढोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ज्या मतदान केंद्रावर मतदान होते, त्या केंद्रावर ढोरे यांना केवळ एक मत मिळाले. तसेच दुसरे उमेदवार पंकज उपाध्ये यांचे व त्यांच्या कुटुंबीयांची मतदान केंद्र क्र.१९ व २0 मध्ये १00 मते आहेत. त्यांनी मतदान केले असताना उपाध्ये यांना केवळ २0 मते मिळाली, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्रावर झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम मशीनद्वारे दाखविण्यात आलेले मतदान, यामध्ये तफावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.फेरमतमोजणीची मागणी फेटाळल्याचा आरोप!मतमोजणी प्रक्रियेत गोंधळाच्या पृष्ठभूमीवर उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे करण्यात आली; मात्र फेरमतमोजणीची मागणी फेटाळण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.