शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीत गोंधळ; पराभूत उमेदवारांचा ‘एल्गार’!

By admin | Updated: February 25, 2017 02:23 IST

फेरमतदान घेण्याची मागणी; कलेक्टर बंगल्यावर धडक

अकोला, दि. २४- महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, भाजप वगळता विविध राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी एल्गार पुकारला. राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी शुक्रवारी कलेक्टर बंगल्यावर धडक देऊन, मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रियेत ईव्हीएममध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले, असा आरोप करीत, निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीतील गोंधळाविरुद्ध ह्यएल्गार पुकारला. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी बंगल्यावर धडक देत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. ह्यईव्हीएमह्णद्वारे मतमोजणीत झालेला निर्णय अमान्य असून, ईव्हीएम ताब्यात घेऊन ह्यसीलह्ण करण्यात याव्या व यासंदर्भात सखोल चौकशी करून महानगरपालिका निवडणुकीसाठी मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, मदन भरगड, अविनाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार मुलचंदाणी, भारिप-बमसंचे बालमुकुंद भिरड, बुद्धरत्न इंगोले, वंदना वासनिक, शिवसेनेचे तरुण बगेरे, नंदू ढोरे, नकुल ताथोड, प्रल्हाद ढोरे यांच्यासह पराभूत उमेदवार उपस्थित होते.एका उमेदवाराला एकच मत; दुसर्‍याला केवळ २0 मते!महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्र.१३ मध्ये उमेदवार नंदू ढोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ज्या मतदान केंद्रावर मतदान होते, त्या केंद्रावर ढोरे यांना केवळ एक मत मिळाले. तसेच दुसरे उमेदवार पंकज उपाध्ये यांचे व त्यांच्या कुटुंबीयांची मतदान केंद्र क्र.१९ व २0 मध्ये १00 मते आहेत. त्यांनी मतदान केले असताना उपाध्ये यांना केवळ २0 मते मिळाली, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्रावर झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम मशीनद्वारे दाखविण्यात आलेले मतदान, यामध्ये तफावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.फेरमतमोजणीची मागणी फेटाळल्याचा आरोप!मतमोजणी प्रक्रियेत गोंधळाच्या पृष्ठभूमीवर उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे करण्यात आली; मात्र फेरमतमोजणीची मागणी फेटाळण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.