शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रात मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST

अकोला : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत ...

अकोला : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. ही गर्दी होणार हे लक्षात घेऊन नागरिकांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा मुद्दा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बैठकीत उपस्थित केला. त्यावर मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश कडू यांनी मनपा आयुक्त निमा अरोरा यांना दिले.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री कडू यांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या दालनात आढावा घेतला. आढावा बैठकीला सेनेचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस उपअधीक्षक मोनिका राऊत यांच्यासह जिल्हा वैद्यकीय आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना भर उन्हात रांगेमध्ये तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यांना बसण्यासाठी मनपाने खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडप व पिण्याच्या पाण्याची सुविधा का उपलब्ध केली नाही, असा सवाल आ. देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर लसीकरण ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया असल्यामुळे लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना या वेळी दिले.

मनपाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

मनपाच्या लसीकरण केंद्रांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, अधिपरिचारिका मानसिक दबावात आहेत. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. या सर्व बाबींचा अभाव दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केले होते, असे आ. देशमुख यांनी नमूद केले.

कोरोनाच्या संकटात नोटिसा का दिल्या?

शहरावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारातील दुकाने खाली करण्याची घाई का झाली, व्यावसायिकांना नोटिसा का दिल्या, असा सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर ही प्रक्रिया थांबविण्याची सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली.