शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

लसीकरण केंद्रात मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST

अकोला : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत ...

अकोला : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. ही गर्दी होणार हे लक्षात घेऊन नागरिकांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा मुद्दा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बैठकीत उपस्थित केला. त्यावर मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश कडू यांनी मनपा आयुक्त निमा अरोरा यांना दिले.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री कडू यांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या दालनात आढावा घेतला. आढावा बैठकीला सेनेचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस उपअधीक्षक मोनिका राऊत यांच्यासह जिल्हा वैद्यकीय आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना भर उन्हात रांगेमध्ये तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यांना बसण्यासाठी मनपाने खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडप व पिण्याच्या पाण्याची सुविधा का उपलब्ध केली नाही, असा सवाल आ. देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर लसीकरण ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया असल्यामुळे लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना या वेळी दिले.

मनपाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

मनपाच्या लसीकरण केंद्रांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, अधिपरिचारिका मानसिक दबावात आहेत. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. या सर्व बाबींचा अभाव दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केले होते, असे आ. देशमुख यांनी नमूद केले.

कोरोनाच्या संकटात नोटिसा का दिल्या?

शहरावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारातील दुकाने खाली करण्याची घाई का झाली, व्यावसायिकांना नोटिसा का दिल्या, असा सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर ही प्रक्रिया थांबविण्याची सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली.