शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा उद्रेक ...हे अपयश कोणाचे?

By राजेश शेगोकार | Updated: May 28, 2020 12:15 IST

केवळ चिंतन नव्हे, तर थेट मूल्यमापन करून ज्याचे माप त्याच्या पदरात टाकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअकोला हा २८ मे रोजी ५०८ रुग्णसंख्येचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. ७ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णवाढीचा वेग हा अतिशय मंद होता.

 - राजेश शेगोकारअकोला: विदर्भात कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून आता अकोल्याचे नाव प्रामुख्यानेच घ्यावे लागेल, एवढी रुग्णसंख्या अकोल्यात आहे. ७ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णवाढीचा वेग हा अतिशय मंद होता. तब्बल वीस दिवस रुग्णसंख्या ही १७ च्या पुढे गेली नाहीच. शिवाय, रुग्ण ‘कोरोना’मुक्त होण्याचे प्रमाण चांगले होते. एका आत्महत्येसह केवळ एक मृत्यू अशी नोंद अकोल्याच्या नावावर होती; मात्र २८ एप्रिल रोजी पाच रुग्ण आढळले अन् रुग्णवाढीचा सुरू झालेला वेग केवळ महिनाभरात विदर्भात सर्वाधिक ठरला आहे. २७ एप्रिलचे १७ रुग्ण प्रत्यक्षात सातच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अशी स्थिती असलेला अकोला हा २८ मे रोजी ५०८ रुग्णसंख्येचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. हे अपयश कोणाचे, याचे केवळ चिंतन नव्हे, तर थेट मूल्यमापन करून ज्याचे माप त्याच्या पदरात टाकण्याची वेळ आली आहे.२२ मार्चच्या ‘जनता कर्फ्यू’नंतर सुरू झालेल्या ‘लॉकडाउन’च्या कालावधीत सुरुवातीचे दोन-तीन दिवस वगळले, तर कुठेही ‘लॉकडाउन’ची प्रक्रिया कठोरपणे राबविली जात असल्याचे दिसले नाही. जत्रेसारखे भरणारे भाजी बाजार, खोट्या कारणांची भंडोळे मिरवित रस्त्यावर फिरणारे महाभाग यांच्या जोडीला रातोरात निर्माण झालेल्या घरपोच वस्तूंचे ठेकेदार यांची गर्दी शहराच्या कुठल्याही भागात दिसत होती. कुठेही अटकाव केला जात नाही, कारवाई होत नाही, हे पाहून मग जनतेलाही लॉकडाउनचे गांभीर्य राहिले नाही. वेळ, संधी मिळेल तेव्हा लॉकडाउनचा भंग करण्यातही बहुसंख्य अकोलेकर पुढे होते, हे नाकारता येणार नाही. एकीकडे बहुसंख्य जनता अशी बेफिकीर असतानाच प्रशासनही आपल्याच तालात राहिले ते अजूनही असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सर्वोपचार रुग्णालय, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद या यंत्रणांमध्ये कुठेही समन्वय दिसला नाही. प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती, बंदोबस्त, तेथील मोकाटपणा याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडून सांगितल्यावरही दखल घेतल्या गेली नाही. अलगीकरण कक्षातील सुविधा, कोरोनाबाधितांवरील उपचारात हलगर्जी, मृतकांच्या अहलवालांना लागणारा विलंब, इतकेच नाही तर कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून घेण्यासही टाळाटाळ झाल्याचे समोर आल्यावरही कुणावरही कारवाईचा बडगा उचलला गेला नाही. मूर्तिजापुरात संदिग्ध रुग्णाचा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्याचा प्रकारही असाच कठोर कारवाईविना संपविला. कोरोनाबाधितांच्या भोजन व्यवस्थेपासून तर त्यांच्या कक्षातील स्वच्छता, डॉक्टरांची तपासणी अशा अनेक मुद्यांवर व्यवस्थेचे वाभाडे काढणारे व्हिडिओ व आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या; मात्र त्यांची गंभीरपणे दखल न घेतल्यानेच सर्वोपचारचा आधार वाटण्याऐवजी रुग्णांना भीतीच वाटू लागली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्या उपचारांची बोंब असतानाच दुसरीकडे नॉन कोविड रुग्णांचीही परवड वाढत आहे. शहरातील अनेक दवाखान्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण दाखलच करून घ्यायचा नाही, असे परस्पर ठरविले आहे. त्याची दखल कोण घेणार, कोरोनाबाधितांचा वाढता धोका लक्षात घेता खासगी दवाखान्यांच्या अधिग्रहणांबाबत कुठलेही धोरण ठरले नाही. अशा कितीतरी गोष्टी अनेकदा समोर आल्या आहेत; पण गांभीर्याने घेतो कोण, शहरात रुग्णांचे ‘ट्रेसिंग’ चांगले झाले, यात वादच नाही. जर ‘टेस्टिंग’ वाढल्या नसत्या, तर कदाचित याहीपेक्षा मोठा धोका समोर आला असता. त्यामुळे वाढलेल्या ‘टेस्टिंग’ हीच काय ती जमेची बाजू; मात्र ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’नंतर ‘ट्रीटमेंट’ महत्त्वाची आहे. या ‘ट्रीटमेंट’च्या मुद्यावर मात्र आपल्याला युद्धपातळीवर बदल करावे लागणार आहेत. ‘ट्रीटमेंट’ केवळ वैद्यकीयच नाही, तर सुविधांचीही द्यावी लागणार आहे. त्यामुळेच ‘कोरोना’मुक्त होण्याचे प्रमाण वाढू शकेल. सध्या निर्माण झालेली स्थिती हे अपयश कोणाचे, याचे मूल्यमापन होईलच; मात्र आता सर्वात आधी हे शहर आपले आहे, आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे, याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेनेही स्वयंशिस्त पाळून आता शासनाच्या निर्देशाचे पालन करणे अपेक्षित आहे, अन्यथा ‘चौघांची माय अन् खाटल्यावर जीव जाय’, या म्हणीप्रमाणे लोकप्रतिनिधींची मोठी लिस्ट अन् नामांकित वैद्यकीय संस्था असूनही आपल्या हाती केवळ रुग्णवाढीचे आकडे मोजणे एवढेच काम उरेल!

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या