शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर संख्या झपाट्याने वाढतच गेली. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. सोबतच कौटुंबिक हिंसाचारही वाढल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात चार भिंती आड होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोरोना काळातही परिणाम जाणवला नाही. जितक्या घटना घडतात, त्याचा वेळेत तपास लावणे पोलिसांना शक्य होते. दरम्यान, जिल्ह्यात २०१९ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण 336घटना घडल्या. त्यातील 141 प्रकरणांमध्ये यशस्वी मध्यस्थी करून संसार सुरळित करण्यात आले. २०२० मध्ये 373 प्रकरणे दाखल झाली. त्यातील 189 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आली; तर जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये 56 प्रकरणे दाखल झालेली आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात २०२० मध्ये माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेस मानसिक व शारीरिक त्रास देण्याची सर्वाधिक प्रकरणे घडली. त्यापाठोपाठ मूल होत नसल्याच्या कारणावरून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचा समावेश आहे. त्यातील बहुतांश प्रकरणांचा पोलिसांनी छडादेखील लावला आहे.

तथापि, परिवारात एकमेकांसोबत वास्तव्य करीत असताना लहान सहान कारणांवरून संसार विस्कळित होत असल्यास शक्यतोवर मध्यस्थी करून संसार जुळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याची माहिती आहे.

माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा

लॉकडाऊन काळात अनेकांचा छोटा-मोठा उद्योग ठप्प झाला. काही लोकांना नोकरीदेखील गमवावी लागली. महानगरांमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिल्याने नोकरी सोडून अनेकांना गावी परतावे लागले. अशात आर्थिक चणचण भासू लागल्याने पत्नीकडे माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आल्याच्या तक्रारी २०२० मध्ये दाखल झाल्या आहेत..

189 प्रकरणांमध्ये मध्यस्थी

पोलीस दलातील महिला तक्रार निवारण कक्षात (भरोसा) दाखल कौटुंबिक हिंसाचाराच्या 189 प्रकरणांमध्ये मध्यस्थी घडवून आणण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले आहे. यामुळे तुटलेले अनेकांचे संसार पुन्हा जुळले असून तक्रारीही निकाली निघाल्या.