शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सोयाबीन बियाण्याची शेतक-यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: November 30, 2014 22:29 IST

अमरावती विभागात ८६३ तक्रारींचा निपटारा.

संतोष येलकर/अकोलाखरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत अमरावती विभागातील शेतकर्‍यांकडून करण्यात आलेल्या १ हजार ५११ तक्रारींपैकी ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या; मात्र बर्‍याच शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. यासंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाकडे शेतकर्‍यांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती कृषी विभागाच्या प्रत्येक विभाग व जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. प्राप्त तक्रारींचा निपटारा करून, नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकर्‍यांना, त्यांनी घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची रक्कम परत करण्याचे आदेश कृषी विभागामार्फत संबंधित बियाणे कंपन्यांना देण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाच्या तालुकास्तरीय चौकशी समिती अहवालाच्या आधारे शेतकर्‍यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ तक्रारी शेतकर्‍यांकडून करण्यात आल्या. त्यापैकी ८६३ तक्रारींचा संबंधित बियाणे कंपन्यांकडून आतापर्यंत निपटारा करण्यात आला असून, शेतकर्‍यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली.अमरावती विभागात १ हजार ५११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी आतापर्यंत ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित शेतकर्‍यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली. उर्वरित तक्रारींचा निपटारा तातडीने करून, शेतकर्‍यांना बियाण्याची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश बियाणे कंपन्यांना देण्यात आले असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगीतले.