शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

सोयाबीन बियाण्याची शेतक-यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: November 30, 2014 22:29 IST

अमरावती विभागात ८६३ तक्रारींचा निपटारा.

संतोष येलकर/अकोलाखरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत अमरावती विभागातील शेतकर्‍यांकडून करण्यात आलेल्या १ हजार ५११ तक्रारींपैकी ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या; मात्र बर्‍याच शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. यासंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाकडे शेतकर्‍यांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती कृषी विभागाच्या प्रत्येक विभाग व जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. प्राप्त तक्रारींचा निपटारा करून, नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकर्‍यांना, त्यांनी घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची रक्कम परत करण्याचे आदेश कृषी विभागामार्फत संबंधित बियाणे कंपन्यांना देण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाच्या तालुकास्तरीय चौकशी समिती अहवालाच्या आधारे शेतकर्‍यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ तक्रारी शेतकर्‍यांकडून करण्यात आल्या. त्यापैकी ८६३ तक्रारींचा संबंधित बियाणे कंपन्यांकडून आतापर्यंत निपटारा करण्यात आला असून, शेतकर्‍यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली.अमरावती विभागात १ हजार ५११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी आतापर्यंत ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित शेतकर्‍यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली. उर्वरित तक्रारींचा निपटारा तातडीने करून, शेतकर्‍यांना बियाण्याची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश बियाणे कंपन्यांना देण्यात आले असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगीतले.