शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

दिलासा : अकोल्याचा रिकव्हरी रेट ५.७ टक्क्यांनी वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता, मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यात कोविड रुग्णांची ...

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता, मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. मार्च महिन्यात कोरोनाचा कहर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही दिसून आला. नागपूर, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली. या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याचे दिसून आले, मात्र आठवडाभरात अनेक जिल्ह्यांची स्थिती बदलली. प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घसरले होते, त्यामध्ये आता सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास तुलनेने अकोल्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय कमी दिसू लागले. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ७८.४ टक्क्यांवर आला होता. हा विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट होता, मात्र गत आठवड्यापासून यात काही प्रमाणात सुधारणा दिसू लागली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ५.७ टक्क्यांनी वाढून ८४.१ टक्क्यांवर आला आहे.

मृत्यूदर घसरला, पण चिंता कायम

गत महिनाभरापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे, मात्र आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर घसरून १.६ टक्क्यांवर आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दररोज जाणारे कोरोनाचे बळी चिंता वाढवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.