शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

जड वाहतूक बंद करण्यासाठी नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गत अनेक दिवसांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर ...

श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गत अनेक दिवसांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना जड वाहनांमुळे त्रास होत आहे. जड वाहतुकीमुळे अनेक लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर लहान मुले खेळत खेळत रस्त्यावर येतात. जड वाहनामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. २९ डिसेंबर रोजी संभाजी चौकात जड वाहनांमुळे लहान मुलीचा अपघात होता होता टळला. तरी या मार्गावर जड वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली. यावेळी अमोल आकोटकर, रामभाऊ फाटकर, मंगेश ठाकरे, स्वप्निल सुरे, महेश ठाकरे, राहुल झापर्डे, राम खारोडे, सुनील फाटकर, राजेश मामनकार, संतोष मानकर, दीपक टिकार, शंकरराव सुरे, गणेश लासूरकार, किशोर सायानी, विठ्ठल मामनकार, श्याम खारोडे, प्रकाश वासनकर, विशाल सोनटक्के, विठ्ठल बनकर, महेश हागे, गिरीश घोडेश्वर, आकाश फाटकर, शुभम सोनटक्‍के, तेजस बाभुळकर, शुभम टिकार, प्रकाश ज्ञानेश्वर आवारे, विलास देशमुख, सागर सोनटक्के, शुभम सुरे, विठ्ठल मामनकर, प्रणव मामनकर, शिवम फाटे आदी नागरिक उपस्थित होते.

.............................

तेल्हारा शहरातील आठवडी बाजार ते शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाक्यापर्यंत जड वाहतूक असल्यास त्या वाहनावर कारवाई करण्यात येईल.

दिनेश शेळके, ठाणेदार, पोलीस स्टेशन, तेल्हारा