शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

थंडी ओसरली, हरभरा संकटात विविध किडींचा हल्ला

By admin | Updated: December 12, 2014 01:26 IST

खरीप हंगामातील पिके शेतक-यांच्या हातून गेलीत.

अकोला : यावर्षी खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली असून, आता रब्बी हंगामावरही संकट आले आहे. जिल्ह्यातील हरभरा हे रब्बी हंगामात महत्त्वाचे पीक आहे. जिल्‘ात यावर्षी लाखो हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी करण्यात आली; मात्र थंडीच नसल्यामुळे दव पडत नसून, पिकांना पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे.यावर्षी पावसाळ्यात दोन महिने उशिरा पाऊस झाला. त्यामुळे उडीद व मुगाच्या पिकांची पेरणी करता आली नाही. त्यातच अल्प पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिकांपासून अपेक्षा होती. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओल नव्हती. याचा परिणाम रब्बी पिकांवर पडला. शेतकर्‍यांनी लाखो हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी केली. थंडी पडली तर सकाळी वातावरणात दव तयार होते. हे दव झाडांवर पडल्यानंतर त्यातून झाडे पाणी शोषून घेतात. त्यामुळे झाडांना वाढण्यास व फळधारणा करण्यास मदत होते. यावर्षी सुरुवातीपासूनच थंडी कमी पडत आहे. सध्या डिसंेबर महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी पारा ३१ डिग्री सेल्सीअस आहे. त्यात गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. खरीप हंगामात पिके गेल्यावर रब्बी हंगामापासून काही उत्पन्न मिळेल, अशा अपेक्षेने शेती करीत असताना हरभरा पिकाचेही नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.  *ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी ओसरली आहे. याचा फटका हरभरा पिकाला बसणार आहे. ढगाळ वातावरण किडींना पोषक असल्यामुळे प्रादुर्भावही वाढला आहे. हरभर्‍यावर सध्या विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकर्‍यांना फवारणीसाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे.