शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

झारखंडचा चिमुरडा महिन्यापासून अकोल्यात

By admin | Updated: October 12, 2014 00:28 IST

रेल्वे सुटली : घरी सोडण्यास कोणी पुढे येईना.

आगाखान पठान / बाभूळगाव जहागीर (अकोला)मोठय़ा भावासोबत रोजगाराच्या शोधात रेल्वेने मुंबईला जाणारा झारखंडमधील १२ वर्षीय मुलगा अकोला स्टेशनवर पाणी पिण्यासाठी उतरला. मात्र रेल्वे सुटल्याने तो स्टेशनवरच राहिला. मागील एका महिन्यापासून अकोला तालुक्यातील एका कुटुंबाकडे आश्रयास आहे. झारखंडमधील सायबगंज जिल्हय़ातील मिर्झा चौकी गावातील सोनुकुमार छोटू नोनिया असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. मुंबईला जाताना, रात्री अकोला रेल्वेस्थानकावर गाडी थांबली. पाणी पिण्यासाठी सोनु एकटाच खाली उतरला. पाणी शोधत असतानाच रेल्वे सुटली. त्याने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला; पण तो व्यर्थ ठरला. मोठा भाऊ झोपलेला असल्यामुळे त्याच्याही लक्षात आले नाही. भांबावलेला सोनु रेल्वे स्थानकावर रडत राहिला. गावाला कसे परत जावे, गाडी पकडण्यासाठी पैसे कोठून आणावे, या विवंचनेमुळे तो रेल्वे रूळाने परत चालू लागला. तो यावलखेड रेल्वे स् थानकाजवळ आला. तिथे सिसा बोंदरखेडचे पोलीस पाटील सिंधू बाबाराव डोंगरे यांनी विचारपूस केली असता, त्याने हकिकत कथन केली. त्यांनी बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मात्र निवडणुकीच्या बंदोबस्ताचे कारण सांगून, तूर्तास तुम्हीच सांभाळा असा सल्ला दिला. काही दिवस सिंधू डोंगरे यांच्याकडे राहिल्यानंतर तो बोंदरखेड-पांढरी येथील अर्जुन चव्हाण यांच्या घरी राह त आहे. आई-वडिलांपासून दूर असलेल्या सोनुला त्याच्या गावी परत जायचे आहे; परंतु त्याला मदत करण्यास कुणीही पुढे आलेले नाही.यासंदर्भात बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. के. आव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कोणतीही घटना माझ्या माहितीत नसल्याचे सांगुण गावात कर्मचार्‍यांना पाठवून माहिती घेतो, असे म्हटले.