शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

हवामान बदलानुसार पीकपद्धतीत बदला करावा लागेल!

By admin | Updated: March 10, 2016 01:54 IST

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा शेतक-यांना सल्ला

विवेक चांदूरकर / वाशिमव-हाडात ७00 ते ९00 मिमी पाऊस पडतो; मात्र त्यानंतरही येथे कृषिव्यवसायाची अधोगती झाली असून, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गचक्र बदलले आहे. ऋतुमानही बदलले आहे. या बदलांचा अभ्यास करून शेतकर्‍यांना पीकपद्धतीत बदल करावा लागेल, अन्यथा आत्महत्यांचा हा क्रम असाच सुरू राहील, असा सल्ला मॅगसेसे पुरस्कारविजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी शेतकर्‍यांना दिला. जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यक्रमासाठी ते वाशिम येथे आले होते.प्रश्न : वर्‍हाडात तीन वर्षांंपासून सरासरीएवढा पाऊस पडत असल्यावरही दुष्काळ कायम आहे ? उत्तर: वातावरणात बदल झाला आहे. वृक्षतोड व ग्लोबल वॉर्मिंंगमुळे तापमान वाढले आहे. परिणामी विदर्भात पेरणीच्या वेळी पाऊस येत नाही, तर ज्यावेळी पीक काढणीला येते तेव्हा पाऊस होतो. त्यानुसार शेतकर्‍यांना पीकपद्धतीतही बदल करावा लागणार आहे. बदलत्या पावसाचा अभ्यास करावा लागणार आहे. पारंपरिक पीकपद्धती सोडून नवी पिके घ्यावी लागतील, तरच शेतकरी तग धरू शकेल; अन्यथा दरवर्षीच दुष्काळ कायम राहील. प्रश्न : शेतकर्‍यांना पीकपद्धतीत कशाप्रकारे बदल करावे लागतील?उत्तर: काही पिके तीन महिन्यांची असतात, तर काही सहा महिन्यांची असतात. कमी कालावधीच्या पिकांची मुळं ही जमिनीत एक ते दीड फूट खोलात जातात. त्यांना कमी प्रमाणात पाणी लागते. जी पिके सहा महिन्यांची असतात, त्यांची मुळं जमिनीत अधिक खोलवर जातात. त्यांना जास्त पाणी लागते. पावसाच्या प्रमाणानुसार पिके घ्यायला हवीत. प्रश्न : काही जलतज्ज्ञांनी जलयुक्त शिवार चुकीचे असल्याचा दावा केला आहे ? उत्तर: जलयुक्त शिवार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे. मी स्वत: याचा आराखडा तयार केला आहे. याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली, तर निश्‍चितच पाणीटंचाई दूर होईल. जलयुक्त शिवार चुकीचे असल्याचे म्हणणारे यंत्राच्या साहाय्याने कामे करतात. त्याचा पुरस्कार ते करतात; मात्र लोकांच्या मदतीने जलसंवर्धनाचे काम केले, तर चांगले निकाल निश्‍चितच दिसतात. प्रश्न : जलयुक्त शिवार अभियानातील कामे चांगल्या दर्जाची होत आहेत काय? उत्तर: जलयुक्त शिवारमध्ये होत असलेली कामे ही ठेकेदारांच्या माध्यमातून होत आहेत. ही कामे जर नागरिकांच्या सहभागाने अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली, तर निश्‍चितच पाणीटंचाई दूर होईल. ठेकेदार स्वत:चा फायदा पाहतात. अधिकारी मात्र गावाचा व देशाचा फायदा पाहून कामे करतात. प्रश्न : जलयुक्तच्या कामांमध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे काय?उत्तर: जलसंवर्धनाच्या कामांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे. गावात जलसंवर्धनाची कामे करीत असताना स्थानिकांकडून कोणती कामे कोणत्या ठिकाणी करावी, याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांना अधिकार्‍यांपेक्षा त्यांच्या गावाचा चांगला अभ्यास असतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या सहभागाने कामे करायला हवीेत. त्यांचा सहभाग लाभला, तर पाण्याचा वापरही योग्य पद्धतीने होईल. प्रश्न : शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेबद्दल तुमचे काय मत आहे ? उत्तर: शासनाच्यावतीने स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय? चांगले रस्ते, काचेच्या इमारती यालाच स्मार्ट सिटी म्हणता येईल काय? त्यापेक्षा शासनाने स्मार्ट गाव, स्मार्ट नदी योजना राबवायला हवी.