शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलानुसार पीकपद्धतीत बदला करावा लागेल!

By admin | Updated: March 10, 2016 01:54 IST

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा शेतक-यांना सल्ला

विवेक चांदूरकर / वाशिमव-हाडात ७00 ते ९00 मिमी पाऊस पडतो; मात्र त्यानंतरही येथे कृषिव्यवसायाची अधोगती झाली असून, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गचक्र बदलले आहे. ऋतुमानही बदलले आहे. या बदलांचा अभ्यास करून शेतकर्‍यांना पीकपद्धतीत बदल करावा लागेल, अन्यथा आत्महत्यांचा हा क्रम असाच सुरू राहील, असा सल्ला मॅगसेसे पुरस्कारविजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी शेतकर्‍यांना दिला. जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यक्रमासाठी ते वाशिम येथे आले होते.प्रश्न : वर्‍हाडात तीन वर्षांंपासून सरासरीएवढा पाऊस पडत असल्यावरही दुष्काळ कायम आहे ? उत्तर: वातावरणात बदल झाला आहे. वृक्षतोड व ग्लोबल वॉर्मिंंगमुळे तापमान वाढले आहे. परिणामी विदर्भात पेरणीच्या वेळी पाऊस येत नाही, तर ज्यावेळी पीक काढणीला येते तेव्हा पाऊस होतो. त्यानुसार शेतकर्‍यांना पीकपद्धतीतही बदल करावा लागणार आहे. बदलत्या पावसाचा अभ्यास करावा लागणार आहे. पारंपरिक पीकपद्धती सोडून नवी पिके घ्यावी लागतील, तरच शेतकरी तग धरू शकेल; अन्यथा दरवर्षीच दुष्काळ कायम राहील. प्रश्न : शेतकर्‍यांना पीकपद्धतीत कशाप्रकारे बदल करावे लागतील?उत्तर: काही पिके तीन महिन्यांची असतात, तर काही सहा महिन्यांची असतात. कमी कालावधीच्या पिकांची मुळं ही जमिनीत एक ते दीड फूट खोलात जातात. त्यांना कमी प्रमाणात पाणी लागते. जी पिके सहा महिन्यांची असतात, त्यांची मुळं जमिनीत अधिक खोलवर जातात. त्यांना जास्त पाणी लागते. पावसाच्या प्रमाणानुसार पिके घ्यायला हवीत. प्रश्न : काही जलतज्ज्ञांनी जलयुक्त शिवार चुकीचे असल्याचा दावा केला आहे ? उत्तर: जलयुक्त शिवार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे. मी स्वत: याचा आराखडा तयार केला आहे. याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली, तर निश्‍चितच पाणीटंचाई दूर होईल. जलयुक्त शिवार चुकीचे असल्याचे म्हणणारे यंत्राच्या साहाय्याने कामे करतात. त्याचा पुरस्कार ते करतात; मात्र लोकांच्या मदतीने जलसंवर्धनाचे काम केले, तर चांगले निकाल निश्‍चितच दिसतात. प्रश्न : जलयुक्त शिवार अभियानातील कामे चांगल्या दर्जाची होत आहेत काय? उत्तर: जलयुक्त शिवारमध्ये होत असलेली कामे ही ठेकेदारांच्या माध्यमातून होत आहेत. ही कामे जर नागरिकांच्या सहभागाने अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली, तर निश्‍चितच पाणीटंचाई दूर होईल. ठेकेदार स्वत:चा फायदा पाहतात. अधिकारी मात्र गावाचा व देशाचा फायदा पाहून कामे करतात. प्रश्न : जलयुक्तच्या कामांमध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे काय?उत्तर: जलसंवर्धनाच्या कामांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे. गावात जलसंवर्धनाची कामे करीत असताना स्थानिकांकडून कोणती कामे कोणत्या ठिकाणी करावी, याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांना अधिकार्‍यांपेक्षा त्यांच्या गावाचा चांगला अभ्यास असतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या सहभागाने कामे करायला हवीेत. त्यांचा सहभाग लाभला, तर पाण्याचा वापरही योग्य पद्धतीने होईल. प्रश्न : शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेबद्दल तुमचे काय मत आहे ? उत्तर: शासनाच्यावतीने स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय? चांगले रस्ते, काचेच्या इमारती यालाच स्मार्ट सिटी म्हणता येईल काय? त्यापेक्षा शासनाने स्मार्ट गाव, स्मार्ट नदी योजना राबवायला हवी.