शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरले सिमेंट बंधारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 02:20 IST

जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम दिसुन येत असून जलपातळीत वाढ झाली आहे.

पातूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण केल्याचा तत्काळ परिणाम दिसून आला असून पातूर तालुक्यातील नांदखेड येथे खोलीकरण केलेल्या बंधार्‍यात पहिल्याच पावसात पाणी भरले. बंधारे पाण्याने तुडुंब भरले. कोरड्या पडलेल्या विहिरींना १५ ते २0 फुटापर्यंत पाणी आले. त्यामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे.पातूर तालुक्यात नांदखेड येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १0 सिमेंट नाल्याच्या बांधाच्या खोलीकरणास मे महिन्यात सुरुवात करण्यात आली. अल्पावधीतच खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, ३0 जून रोजी परिसरात रात्री जोरदार पाऊस आला. या पावसाने खोलीकरण केलेले बंधारे तुडुंब भरले. या परिसरात करण्यात आलेल्या २५00 मीटर खोलीकरणामुळे ९ कोटी १0 लाख लीटर पाणी प्रत्येक बंधार्‍यात साचेल, असा जलतज्ज्ञांचा अंदाज आहे. ३0 जून रोजी रात्रीच्या पावसाने बंधारे भरल्यानंतर ३ जुलै रोजी तीन दिवसातच सायंकाळपर्यंत परिसरातील विहिरींना १५ ते २0 फूट आले. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी हा एकमेव पाण्याचा स्रोत आहे. मागील वर्षीच्या अल्प पावसामुळे विहिरी दिवाळीपासूनच कोरड्या पडू लागल्या होत्या. नाला खोलीकरणामुळे जोरदार आलेल्या पावसाने बंधारे तुडुंब भरले व त्यामुळे विहिरींना पाणी आल्याने पाणीटंचाई दूर झाली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला बांध खोलीकरणामुळे पहिल्याच जोरदार पावसात बंधारे भरल्याने व विहिरींना पाणी आल्याने नांदखेडवासीयांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नांदखेड परिसरात नाल्यावर आणखी चार ठिकाणी काँक्रिट बांध बांधणे आवश्यक आहे. तसेच जुन्या चार सिमेंट बांधांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. वन विभागाच्या जमिनीवर माती बांध, वनतळ्यांची निर्मिती, चर खोदणे ही कामेसुद्धा करणे आवश्यक आहे, असे नांदखेड येथील तरुण शेतकरी व भाजप पदाधिकारी ज्ञानेश्‍वर इंगळे यांनी सांगितले.