शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरले सिमेंट बंधारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 02:20 IST

जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम दिसुन येत असून जलपातळीत वाढ झाली आहे.

पातूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण केल्याचा तत्काळ परिणाम दिसून आला असून पातूर तालुक्यातील नांदखेड येथे खोलीकरण केलेल्या बंधार्‍यात पहिल्याच पावसात पाणी भरले. बंधारे पाण्याने तुडुंब भरले. कोरड्या पडलेल्या विहिरींना १५ ते २0 फुटापर्यंत पाणी आले. त्यामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे.पातूर तालुक्यात नांदखेड येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १0 सिमेंट नाल्याच्या बांधाच्या खोलीकरणास मे महिन्यात सुरुवात करण्यात आली. अल्पावधीतच खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, ३0 जून रोजी परिसरात रात्री जोरदार पाऊस आला. या पावसाने खोलीकरण केलेले बंधारे तुडुंब भरले. या परिसरात करण्यात आलेल्या २५00 मीटर खोलीकरणामुळे ९ कोटी १0 लाख लीटर पाणी प्रत्येक बंधार्‍यात साचेल, असा जलतज्ज्ञांचा अंदाज आहे. ३0 जून रोजी रात्रीच्या पावसाने बंधारे भरल्यानंतर ३ जुलै रोजी तीन दिवसातच सायंकाळपर्यंत परिसरातील विहिरींना १५ ते २0 फूट आले. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी हा एकमेव पाण्याचा स्रोत आहे. मागील वर्षीच्या अल्प पावसामुळे विहिरी दिवाळीपासूनच कोरड्या पडू लागल्या होत्या. नाला खोलीकरणामुळे जोरदार आलेल्या पावसाने बंधारे तुडुंब भरले व त्यामुळे विहिरींना पाणी आल्याने पाणीटंचाई दूर झाली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला बांध खोलीकरणामुळे पहिल्याच जोरदार पावसात बंधारे भरल्याने व विहिरींना पाणी आल्याने नांदखेडवासीयांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नांदखेड परिसरात नाल्यावर आणखी चार ठिकाणी काँक्रिट बांध बांधणे आवश्यक आहे. तसेच जुन्या चार सिमेंट बांधांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. वन विभागाच्या जमिनीवर माती बांध, वनतळ्यांची निर्मिती, चर खोदणे ही कामेसुद्धा करणे आवश्यक आहे, असे नांदखेड येथील तरुण शेतकरी व भाजप पदाधिकारी ज्ञानेश्‍वर इंगळे यांनी सांगितले.