शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

विद्यार्थ्यांंच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच!

By admin | Updated: December 2, 2015 02:43 IST

ओझे कमी करण्याची मुदत संपली : दोन संच देण्यास पुस्तकांचाही तुटवडा

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): विद्यार्थ्यांंच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून, हे ओझे कमी करण्यासाठी राज्यभरातील शाळांना ३0 नोव्हेंबरपर्यंंतची मुदत देण्यातआली होती. त्यासाठी राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना दोन पुस्तक संच देण्याचा उपक्रम राबविण्यात आला; मात्र पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याने मुदत संपूनही विद्यार्थ्यांंवर दप्तरांचे ओझे कायम दिसून येत आहे.राज्यात ५२ हजार ९९१ प्राथमिक व २८ हजार १४५ उच्च प्राथमिक शाळा आहेत. मुलांचे दप्तर उघडले की, त्यात पाठ्यपुस्तके, वह्या, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, सहा मुख्य विषयांची पुस्तके, खासगी प्रकाशकांच्या वर्कबुक्स, सर्व विषयांच्या वर्गपाठ-गृहपाठाच्या २00-२00 पानी वह्या, निबंधाच्या वह्या, कंपासपेटी, निरनिराळ्या रंगपेट्या व इतर खेळण्याचे साहित्य घेऊन मुलं शाळेत येतात. याशिवाय शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव असल्यास त्याचे वेगवेगळे पोशाख आणि साहित्यही आणावे लागते. शाळा सुटल्यावर लगेच वर्ग भरत असल्यास त्याच्या वह्या सोबत असतात. उपयुक्तता न तपासता हे ओझे विद्यार्थ्यांंना वाहावे लागते. विद्यार्थ्यांंंच्या बौद्धीक वाढीबरोबरच निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांंना तणावमुक्त करून आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंंतच्या विद्यार्थ्यांंंच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय २१ जुलै रोजी शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ३0 नोव्हेंबरपर्यंंंत राज्यभरातील शाळांना करावी लागणार होती. त्यानुसार राज्यातील काही शाळांनी शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (एक विद्यार्थ्याच्या घरी आणि दुसरा शाळेत) करावेत; असा उपक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थ्यांंंना पुस्तकाचे दोन संच आवश्यक आहेत. मात्र, पुस्तकांचा तुटवडा असल्याने राज्यातील काहीच शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबाजावणी होऊ शकली आहे. दरम्यान दप्तराचे ओझे कमी करण्याची मुदत संपुणही राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कायम असल्याचे दिसून येत आहे.