शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अन्यायाची परंपरा खंडित करा;

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

वेगळ्या विदर्भ चळवळीला साथ द्या- शरद पाटील

अकोला: आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राजकारण्यांसाठी ही महत्त्वाची वेळ आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज सत्ताधीशांपर्यंंत पोहोचवा, अन्यायाची परंपरा खंडित करून, वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला साथ द्या, असे आवाहन जनमंच या सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रा. शरद पाटील यांनी रविवारी सकाळी १0.३0 वाजता आयएमए हॉलमध्ये आयोजित बैठकीत विदर्भवाद्यांना केले. जनमंच संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी आयोजित ह्यरेल देखो बस देखोह्ण आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शरद पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे होते. यावेळी मंचावर अँड. अनिल किलोरे, कृष्णा अंधारे, गणेश पोटे यांची उपस्थिती होती. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका मांडताना शरद पाटील म्हणाले की, नेतृत्व करणारा कोणत्या समाजाचा आहे, हे बघायला नको, या समाजवादानेच देश बुडवला आहे. नेतृत्व करणारी व्यक्ती प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. आगामी तीन महिने महत्त्वाचे आहेत. यानंतर नेते पाच वर्षे हाती लागणार नाहीत. त्यामुळे जनतेने पुढील तीन महिन्यात क्रियाशील राहून वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सहभागी व्हायला हवे. हिंदी भाषिक लोकांची पाच राज्य आहेत तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी चंद्रकांत वानखडे म्हणाले की, तीन महिन्यांनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.निवडणुकीच्या काळात अनेक चमत्कार घडतात. गेंड्याची कातडी असलेले नेते मुलायम होतात. त्यामुळे आंदोलनाची हीच योग्य वेळ आहे. भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल होते. आता मात्र त्यांची भाषा बदलली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच वेगळा विदर्भ व्हायला हवा, अशी आमची मागणी आहे. वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी आहे, आम्ही घेतलेल्या मतदानातून ते व्यक्त झालं आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन वानखडे यांनी केले. यावेळी अँड. अनिल किलोरे व गणेश पोटे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक कृष्णा अंधारे यांनी तर संचालन धनंजय मिश्रा यांनी केले.