शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

बोगस बीटीचे पाकीट तीनशे रुपयात !

By admin | Updated: June 25, 2014 02:40 IST

विदर्भातील शेतकर्‍यांची फसवणूक

अकोला : तणनाशक तंत्रज्ञान असल्याचे भासवून विदर्भात सर्रासपणे बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे शेतकर्‍यांचा कल कापूस पिकाकडे वाढला आहे. याचाच गैरफायदा बोगस बीटी बियाणे विक्री करणारे घेत आहेत. एका नामांकि त बीटी कापूस कंपनीने बोंडअळीला प्रतिबंधक जिन्ससोबतच बीटी बियाण्यांमध्ये तनणाशकाचे तंत्रज्ञान टाकले असून, लवकरच हे तंत्रज्ञान बाजारात येणार आहे. हे बियाणे बाजारात येण्याअगोदरच विक्रेत्यांनी तीनशे रू पयात बोगस बीटी विकण्याचा सपाटा लावला आहे. गत वर्षी विदर्भातील कापसाचे क्षेत्र सोयाबीनने घेतले होते; मात्र कापसाचे एकरी १0 ते १२ क्विंटलचे उत्पादन झाल्याने, या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढणार आहे. चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी बीटी कापसाचे बियाणे खरेदी करणे सुरू केले आहे. परंतु आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडगार्ड बीटी असे अनेक बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाणे बाजारात विकले जात आहे. या बियाण्यामध्ये बोंडअळीला प्रतिबंध जिन्स असून, ते तणनाशक असल्याचे शेतकर्‍यांना पटवून दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी या बीटीला बळी पडत आहे. हे बियाणे अधिकृत नसून, ते विकण्याची शासनाने परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही. असे असताना या बिटीची विदर्भात सर्रास विक्री सुरू आहे. कृषी विभागाने काही विक्रेत्यांवर थातूर मातूर कारवाई केली; मात्र बियाण्याची विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने कारवाईदेखील मोठय़ा प्रमाणात करण्याची गरज आहे. अमरवती येथील कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी याप्रकरणी काही विक्रेत्यांवर कारवाई केली असल्याचे सांगीतले. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेण्याचे अवाहन केले.