शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

सावधान, १५४ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आजारांचा सर्वाधिक धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी स्वच्छ असणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यातील सुमारे १५४ ...

पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आजारांचा सर्वाधिक धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी स्वच्छ असणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यातील सुमारे १५४ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. जून महिन्यात प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील सुमारे ७७९ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १५४ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. शिवाय, जिल्ह्यातील बहुतांश भाग हा खारपाणपट्ट्यातील असल्याने येथील पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे. क्षारयुक्त पाणी पिण्यायोग्य नसल्यानेही अनेकांना पोटाशी निगडित विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्यास हेच पाणी आजाराचे प्रमुख कारण ठरू शकते.

तालुकानिहाय दूषित पाणी नमुने

तालुका - घेतलेले नमुने - दूषित नमुने

अकोला - ११३ - २१

बार्शिटाकळी - ११९ - १९

अकोट - १४८ - २७

तेल्हारा - १०० - ११

बाळापूर - ७८ - १

पातूर - १२४ - ३७

मूर्तिजापूर - ९७ - ३८

७७९- गावांतील नमुने घेतले तपासणीसाठी

१५४ - गावांतील नमुने आढळले दूषित

शहरी भागात ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

३५२- ठिकाणचे नमुने घेतले

१ - नमुने दूषित आढळले

३५१- नमुने चांगले आढळले

शहरी भागात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे नाल्यातील पाणी जलवाहिनीमार्गे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो.

शहरातील अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा प्रकार जलजन्य आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.

ज्या गावांत तपासणी झालीच नाही त्यांचे काय?

ज्या गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले, त्याच गावातील पिण्याच्या पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने अद्यापही तपासण्यात आले नाहीत. त्यामुळे अशा गावातील पिण्याचे पाणी किती शुद्ध असेल, याचा अंदाजा लावणेही कठीण आहे.

अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापरदेखील केला जात नाही. त्यामुळे अशा गावांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दूषित आणि क्षारयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अनेकांच्या किडणीवर परिणाम झाल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. किडनी व्यतिरिक्त पाेटाशी निगडित इतरही समस्या ग्रामस्थांना उद्भवत आहेत.

या गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर नाहीच

अकोला तालुक्यातील शिवर, शिवणी, मलकापूर, कानशिवणी, येडवण, सोनाळा, खडकी, शिवापूर, हिंगणा, जूना हिंगणा रोड, अकोली बु., सोमठाणा, अमानतपूर, ताकोडा, दुधाळा, मडाळा, बादलापूर या गावांमध्ये ब्लिचिंगपावडरचा वापरच होत नसल्याची माहिती आहे. तसेच बाळापूर तालुक्यातील तामशी, तांदळी, पिंपळगाव, बारलिंगा, मांडवा, कुपटा, खामखेड, धनेगाव, सांगवी या गावांसह मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर, सांजापूर, बिरवाडा, टिपटाळा आदि गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नाही.

आजारी पडायचे नसेल, तर पाणी उकळून प्या!

पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

त्यामुळे यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

आजारी पडायचे नसले, तर पाणी उकळून प्या, असा सल्ला डॉक्टर देतात.

उकळून पाणी पिल्याने पोटाशी निगडित आजारांपासून सहज बचाव करणे शक्य आहे.

तसेच साठवून ठेवलेल्या पिण्याच्या पाण्यात क्लोरिनचा उपयोग देखील करू शकता.