शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणित, भाैतिकशास्त्र येत नसले तरी अभियंता व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

अकाेला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक ...

अकाेला

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी अभ्यासासाठीच्या प्रवेशासाठीच्या आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, बारावीत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय अनिवार्य असणे रद्द केले. या वर्षापासून, बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र न शिकणारे विद्यार्थीही अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या निर्णयाबाबत शैक्षणिक क्षेत्रातच पडसाद उमटत आहेत.

एआयसीटीईच्या सुधारित नियमांनुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि १४ विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेतल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमिक क्रेडिट बँकची (एबीसी) संकल्पना आहे. विद्यार्थी त्याच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर इतर आवडीच्या विषयात शिकायचे असल्यास, ते तो विषय शिकून त्याबद्दलचे प्राप्त क्रेडिटस् त्याच्या एबीसीमध्ये जमा करू शकतो. उदाहरणार्थ, इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी संगीत विषयात आवड असल्यास त्याविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून, त्यात प्राप्त क्रेडिटस् स्वतःच्या पदवीत मिळवू शकतो. नवीन शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षणाला पण प्रोत्साहन दिले आहे.

आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच हीच संकल्पना लागू करण्याचा मानस येथे दिसतोय असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

अभियांत्रिकीचा पाया ठिसूळ करणे अयोग्य

गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शाखेचा पाया आहेत. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता तर मेडिकल सायन्स व इतर लाईफ सायन्सेसमध्ये पण गणित, रसायनशास्त्र यासारख्या विषयांचे ज्ञान असणे उपयोगीच ठरते. त्यामुळे इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होण्यासाठीचे विषयच प्रवेशासाठी नसणे हे निश्चितपणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तयार होणाऱ्या इंजिनिअर्सचा पाया निश्चितपणे ठिसूळ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेट

आताच उद्योगजगतांत लागणारे कौशल्य विद्यापीठातून पदवीप्राप्त इंजिनिअर्समध्ये नसल्याची खंत व्यक्त होताना दिसते आणि आता नवीन बदलाने इंजिनिअर्सचा पायाच कमकुवत राहू शकतो. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणात, उच्च शिक्षणात जे आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे, ते पदवी प्रवेशानंतर, पदवी प्रवेशापूर्वी नाही.

डाॅ. संजय खडक्कार

गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचे ज्ञान इंजिनिअरिंग शिकण्यासाठी आवश्यक आहे, ते ज्ञान, विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर, ब्रीज कोर्स व्दारे शिकतील, असे एआयसीटीईने म्हटले आहे त्यामुळे विद्याथ्याना हे दाेन्ही विषय शिकावेच लागतील

प्राचार्य एस. के. देशमुख शिवाजी महाविद्यालय