शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

गणित, भाैतिकशास्त्र येत नसले तरी अभियंता व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

अकाेला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक ...

अकाेला

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी अभ्यासासाठीच्या प्रवेशासाठीच्या आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, बारावीत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय अनिवार्य असणे रद्द केले. या वर्षापासून, बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र न शिकणारे विद्यार्थीही अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या निर्णयाबाबत शैक्षणिक क्षेत्रातच पडसाद उमटत आहेत.

एआयसीटीईच्या सुधारित नियमांनुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि १४ विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेतल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमिक क्रेडिट बँकची (एबीसी) संकल्पना आहे. विद्यार्थी त्याच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर इतर आवडीच्या विषयात शिकायचे असल्यास, ते तो विषय शिकून त्याबद्दलचे प्राप्त क्रेडिटस् त्याच्या एबीसीमध्ये जमा करू शकतो. उदाहरणार्थ, इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी संगीत विषयात आवड असल्यास त्याविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून, त्यात प्राप्त क्रेडिटस् स्वतःच्या पदवीत मिळवू शकतो. नवीन शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षणाला पण प्रोत्साहन दिले आहे.

आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच हीच संकल्पना लागू करण्याचा मानस येथे दिसतोय असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

अभियांत्रिकीचा पाया ठिसूळ करणे अयोग्य

गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शाखेचा पाया आहेत. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता तर मेडिकल सायन्स व इतर लाईफ सायन्सेसमध्ये पण गणित, रसायनशास्त्र यासारख्या विषयांचे ज्ञान असणे उपयोगीच ठरते. त्यामुळे इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होण्यासाठीचे विषयच प्रवेशासाठी नसणे हे निश्चितपणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तयार होणाऱ्या इंजिनिअर्सचा पाया निश्चितपणे ठिसूळ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेट

आताच उद्योगजगतांत लागणारे कौशल्य विद्यापीठातून पदवीप्राप्त इंजिनिअर्समध्ये नसल्याची खंत व्यक्त होताना दिसते आणि आता नवीन बदलाने इंजिनिअर्सचा पायाच कमकुवत राहू शकतो. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणात, उच्च शिक्षणात जे आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे, ते पदवी प्रवेशानंतर, पदवी प्रवेशापूर्वी नाही.

डाॅ. संजय खडक्कार

गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचे ज्ञान इंजिनिअरिंग शिकण्यासाठी आवश्यक आहे, ते ज्ञान, विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर, ब्रीज कोर्स व्दारे शिकतील, असे एआयसीटीईने म्हटले आहे त्यामुळे विद्याथ्याना हे दाेन्ही विषय शिकावेच लागतील

प्राचार्य एस. के. देशमुख शिवाजी महाविद्यालय