शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

गणित, भाैतिकशास्त्र येत नसले तरी अभियंता व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

अकाेला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक ...

अकाेला

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी अभ्यासासाठीच्या प्रवेशासाठीच्या आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, बारावीत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय अनिवार्य असणे रद्द केले. या वर्षापासून, बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र न शिकणारे विद्यार्थीही अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या निर्णयाबाबत शैक्षणिक क्षेत्रातच पडसाद उमटत आहेत.

एआयसीटीईच्या सुधारित नियमांनुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि १४ विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेतल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमिक क्रेडिट बँकची (एबीसी) संकल्पना आहे. विद्यार्थी त्याच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर इतर आवडीच्या विषयात शिकायचे असल्यास, ते तो विषय शिकून त्याबद्दलचे प्राप्त क्रेडिटस् त्याच्या एबीसीमध्ये जमा करू शकतो. उदाहरणार्थ, इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी संगीत विषयात आवड असल्यास त्याविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून, त्यात प्राप्त क्रेडिटस् स्वतःच्या पदवीत मिळवू शकतो. नवीन शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षणाला पण प्रोत्साहन दिले आहे.

आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच हीच संकल्पना लागू करण्याचा मानस येथे दिसतोय असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

अभियांत्रिकीचा पाया ठिसूळ करणे अयोग्य

गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शाखेचा पाया आहेत. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता तर मेडिकल सायन्स व इतर लाईफ सायन्सेसमध्ये पण गणित, रसायनशास्त्र यासारख्या विषयांचे ज्ञान असणे उपयोगीच ठरते. त्यामुळे इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होण्यासाठीचे विषयच प्रवेशासाठी नसणे हे निश्चितपणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तयार होणाऱ्या इंजिनिअर्सचा पाया निश्चितपणे ठिसूळ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेट

आताच उद्योगजगतांत लागणारे कौशल्य विद्यापीठातून पदवीप्राप्त इंजिनिअर्समध्ये नसल्याची खंत व्यक्त होताना दिसते आणि आता नवीन बदलाने इंजिनिअर्सचा पायाच कमकुवत राहू शकतो. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणात, उच्च शिक्षणात जे आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे, ते पदवी प्रवेशानंतर, पदवी प्रवेशापूर्वी नाही.

डाॅ. संजय खडक्कार

गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचे ज्ञान इंजिनिअरिंग शिकण्यासाठी आवश्यक आहे, ते ज्ञान, विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर, ब्रीज कोर्स व्दारे शिकतील, असे एआयसीटीईने म्हटले आहे त्यामुळे विद्याथ्याना हे दाेन्ही विषय शिकावेच लागतील

प्राचार्य एस. के. देशमुख शिवाजी महाविद्यालय