शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

लाभार्थींचे अनुदान जमा करण्यास बँकेचा नकार

By admin | Updated: July 5, 2017 00:48 IST

अकोट तहसील कार्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींचे अनुदान आधीच रखडलेले असताना अकोट तहसील कार्यालयाने चार महिन्यांचे अनुदान लाभार्थींना देण्याकरिता बँक आॅफ महाराष्ट्रच्या अकोट शाखेत पाठविले; परंतु सदर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची सेवा बँकेने नाकारली आहे. याबाबत अकोट तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल पाठविला आहे. यापूर्वी लाभार्थींना सेवा देणाऱ्या बँकेने यावेळेस प्रथमच धनादेश जमा करून घेण्यास नकार दिल्याने लाभार्थींना अजून काही दिवस ताटकळत राहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेतील २६५ लाभार्थींच्या मार्च ते जून २०१७ पर्यंतच्या अनुदानाचा ६ लाख ९८ हजार रुपये रकमेचा ३० जून रोजीचा धनादेश व लाभार्थींची यादी अकोट येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे पाठविली; परंतु बँकेने त्यांच्याकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रत्येकाच्या खात्यात स्वतंत्र्यपणे रक्कम जमा करणे शक्य नाही, असे नमूद करीत आॅनलाइन एनईएफटीच्या सुविधेने सरळ खात्यात जमा करावी, असा सल्ला देत सदर धनादेश उलट टपाली अकोट तहसील कार्यालयाला परत पाठविला. त्यामुळे नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी बँकेला पुन्हा पत्र देऊन एनएफटी करणे वा धनादेश क्लिअरिंग करणे सर्वस्वी खातेदारांची ऐच्छिक बाब आहे, बँकेने तशी सेवा देणे अपेक्षित असून, एनईएफटीद्वारे अनुदान वाटप करण्याचे निर्देश नसल्याचे नमूद केले. तसेच लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा न केल्यास व विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी बँकेवर राहणार असून, तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे कळविले. त्यावर बँकेने केंद्र सरकारच्या डीबीटी योजने अंतर्गत सर्व प्रकारची सरकारी कामे प्रत्यक्ष सरकारी खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अंतरिम करण्याचे निर्देश आहेत, त्यामुळे आपले खाते असणाऱ्या बँकेस तसे निर्देश देण्याचे कळविण्याचे उलट टपाली पत्र पाठविले. त्यानंतर सं.गा.यो.चे नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी ४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल पाठविला आहे. यामध्ये बँकेने दिलेल्या उत्तराचा तपशील नमूद करीत केंद्र सरकारचे अनुदान अप्राप्त असल्यामुळे सं.गा.यो. कार्यालयाकडून राज्य शासनाचे अनुदान बँकेमध्ये पाठविण्यात आले; परंतु बँकेने सेवा नाकारली असल्याचे नमूद करीत योग्य उचित कार्यवाहीचा अहवाल सादर केला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून अकोट तालुक्यातील ३० बँकांमधून संजय गांधी योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. अकोट येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या रकमेचा धनादेश दिल्यानंतर बँकेत खाते असलेल्या लाभार्थींच्या खात्यातून त्यांची रक्कम देण्यात येते; मात्र यावेळेस महाराष्ट्र बँकेने धनादेश घेण्यापासून तर लाभार्थींच्या खात्यात रक्कम टाकेपर्यंत उलट टपाली उत्तरे पाठविली आहेत. अशा स्थितीत निराधार असलेल्या लाभार्थींची परवड होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.