शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थींचे अनुदान जमा करण्यास बँकेचा नकार

By admin | Updated: July 5, 2017 00:48 IST

अकोट तहसील कार्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींचे अनुदान आधीच रखडलेले असताना अकोट तहसील कार्यालयाने चार महिन्यांचे अनुदान लाभार्थींना देण्याकरिता बँक आॅफ महाराष्ट्रच्या अकोट शाखेत पाठविले; परंतु सदर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची सेवा बँकेने नाकारली आहे. याबाबत अकोट तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल पाठविला आहे. यापूर्वी लाभार्थींना सेवा देणाऱ्या बँकेने यावेळेस प्रथमच धनादेश जमा करून घेण्यास नकार दिल्याने लाभार्थींना अजून काही दिवस ताटकळत राहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेतील २६५ लाभार्थींच्या मार्च ते जून २०१७ पर्यंतच्या अनुदानाचा ६ लाख ९८ हजार रुपये रकमेचा ३० जून रोजीचा धनादेश व लाभार्थींची यादी अकोट येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे पाठविली; परंतु बँकेने त्यांच्याकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रत्येकाच्या खात्यात स्वतंत्र्यपणे रक्कम जमा करणे शक्य नाही, असे नमूद करीत आॅनलाइन एनईएफटीच्या सुविधेने सरळ खात्यात जमा करावी, असा सल्ला देत सदर धनादेश उलट टपाली अकोट तहसील कार्यालयाला परत पाठविला. त्यामुळे नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी बँकेला पुन्हा पत्र देऊन एनएफटी करणे वा धनादेश क्लिअरिंग करणे सर्वस्वी खातेदारांची ऐच्छिक बाब आहे, बँकेने तशी सेवा देणे अपेक्षित असून, एनईएफटीद्वारे अनुदान वाटप करण्याचे निर्देश नसल्याचे नमूद केले. तसेच लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा न केल्यास व विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी बँकेवर राहणार असून, तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे कळविले. त्यावर बँकेने केंद्र सरकारच्या डीबीटी योजने अंतर्गत सर्व प्रकारची सरकारी कामे प्रत्यक्ष सरकारी खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अंतरिम करण्याचे निर्देश आहेत, त्यामुळे आपले खाते असणाऱ्या बँकेस तसे निर्देश देण्याचे कळविण्याचे उलट टपाली पत्र पाठविले. त्यानंतर सं.गा.यो.चे नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी ४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल पाठविला आहे. यामध्ये बँकेने दिलेल्या उत्तराचा तपशील नमूद करीत केंद्र सरकारचे अनुदान अप्राप्त असल्यामुळे सं.गा.यो. कार्यालयाकडून राज्य शासनाचे अनुदान बँकेमध्ये पाठविण्यात आले; परंतु बँकेने सेवा नाकारली असल्याचे नमूद करीत योग्य उचित कार्यवाहीचा अहवाल सादर केला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून अकोट तालुक्यातील ३० बँकांमधून संजय गांधी योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. अकोट येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या रकमेचा धनादेश दिल्यानंतर बँकेत खाते असलेल्या लाभार्थींच्या खात्यातून त्यांची रक्कम देण्यात येते; मात्र यावेळेस महाराष्ट्र बँकेने धनादेश घेण्यापासून तर लाभार्थींच्या खात्यात रक्कम टाकेपर्यंत उलट टपाली उत्तरे पाठविली आहेत. अशा स्थितीत निराधार असलेल्या लाभार्थींची परवड होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.