शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी प्रयत्न!

By admin | Updated: May 31, 2017 02:18 IST

शेतकरी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील केळी विदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, निर्यातदारांना प्रशासनामार्फत सहकार्य करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी केळी उत्पादक शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी निर्यातदार शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही तालुक्यातील केळी विदेशात निर्यात करण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी महाबीजचे महाव्यवस्थापक अशोक अमानकर यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादनासाठी असलेल्या अनुकूल बाबी, केळीचा दर्जा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि शासनाची भूमिका यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील केळीच्या निर्यातीसाठी प्रशासन सकात्मक असून, त्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच केळी पिकाच्या करार शेतीसाठी शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला प्रामुख्याने महाबीजचे महाव्यवस्थापक अशोक अमानकर, अपेडाचे महाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, महाबीजचे गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे प्रफुल्ल लहाने, कृषी समन्वयित प्रकल्प व्यवस्थापक सतीश गद्रे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ राहुल ठाकरे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुरेश बावीस्कर, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्यासह निर्यातदार, शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केळीची निर्यात, शेती करार व केळी पिकाचा दर्जा यासंदर्भात निर्यातदारांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.बियाणे, खते साठेबाजांवर कारवाई करा!खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी, त्या तुलनेत झालेला पुरवठा व वितरणाचा आढावा घेत, बियाणे खतांचा अनधिकृत साठा करणाऱ्या साठेबाजांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांनी धाडी टाकून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कृषी विभागाला यावेळी दिले.प्रस्ताव सादर करा; अंतिम निर्णय जूनमध्ये!निर्यातदारांनी अकोट व तेल्हारा तालुक्यात सर्व्हे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मते जाणून घ्यावी, तसेच प्रशासनाकडून अपेक्षा व सहकार्य याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत, सर्व्हेसाठी आत्मा अंतर्गत शेतकरी मित्रांचे सहकार्य घेऊन प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर जून महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्ट केले. कृषी विभाग, महाबीज, आत्मा व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केळी निर्यातीबाबत नियोजन कसे असावे, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.