शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

नाेकऱ्या द्या अन् करवाढ टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST

१ फेब्रुवारी, २०२१ रोजी भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण २०२१- २०२२ चा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. भारतीय इतिहासात ...

१ फेब्रुवारी, २०२१ रोजी भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण २०२१- २०२२ चा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. भारतीय इतिहासात तो प्रथमच पेपरलेस असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा अर्थसंकल्प असेल. कोविड 19 मुळे हजारो भारतीयांना नोकरी गमवावी लागली आहे व बराच लोकांना पगार कपातीचा पण सामना करावा लागला आहे. महामारीमुळे देशावर आर्थिक संकट, आर्थिक अस्थिरता सर्वदूर दिसत आहे. वित्तीय तूट ही विक्रमी जीडीपीच्या ७.७ टक्के एवढ्या वर पोहोचली आहे. सर्व विकास क्षेत्रांमध्ये मंदी दिसून येत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात अर्थसंकल्पेकडून मदतीची अपेक्षा आहे व आशा आहे.

काेट

हजारो लोकांच्या नोकऱ्या परत आणणे याला अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य असणे जरुरीचे आहे. त्यामुळे आत्मनिर्भर पॅकेज सोबतच लोकांची क्रयशक्ती वाढवणे यासाठी योजना आखणे जरुरीचे आहे. कोरोनामुळे जनसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात नवीन कर टाळणे स्वागतार्ह असेल व सर्वसामान्यांना दिलासादायक ठरेल. सध्या रु. २.५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कर नाही. ती मर्यादा रु. ४ लाखांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तीव्र आर्थिक धक्क्यानंतर विकास मार्गावर येण्यासाठी व सर्वसामान्यांना दिलासा मिळेल यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक नवीन दिशा, सर्व भारतीयांना सापडेल, अशी आशा सर्वांना आहे.

-डाॅ संजय खडक्कार.

माजी तज्ज्ञ सदस्य,

विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

अर्थसंकल्पात ज्या प्रमाणे घाेषणा हाेतात तशी अंमलबजावणी हाेत नाही. जीएसटीची प्रक्रिया सरळ व साेपी करण्याबाबत अनेकदा आश्वासन मिळाले. मात्र, प्रक्रिया दिवसेंदिवस किचकट हाेत चालली आहे. सरकारने कर घ्यावा यात काेणाचेही दुमत नाही. मात्र, नियम व जाचक अटी आणखी साेप्या केल्या पाहिजेत, ही अपेक्षा चुकीची नाही. अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेही अनेक प्रक्रिया कठीण झाल्या आहेत त्या साेप्या व्हाव्यात.

-वसंत बाच्छुका,

उद्याेजक, अकाेला