शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला!

By admin | Updated: December 12, 2015 02:48 IST

आकोट तालुक्यातील दहीहांडा येथे कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला.

अकोला : आकोट तालुक्यातील दहीहांडा येथे कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करून, मारहाण व मोटारसायकलची नासधूस केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ ते २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दहीहांडा येथील १00 ते १२५ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.दहीहांडा येथील कसाईपुर्‍यात असलेल्या कत्तलखान्यात गोवंशाची कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून दहीहांडा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड हे शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता कत्तलखान्यात पोहोचले. त्यावेळी ही घटना घडली. राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार, कापलेल्या बैलाचा पंचनामा करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते नेत असताना १00 ते १२५ स्त्री-पुरुषांच्या जमावाने त्यांना मोटारसायकलवरून खाली पाडले. मारहाण करून त्यांच्या मोटारसायकलची नासधूस केली. जमावाने सरकारी कामात अडथळा आणला, अशी तक्रार हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड यांनी दहीहांडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार १00 ते १२५ लोकांविरुद्ध भा.दं.वि.च्या १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३५३ व ४२७ कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा सुधारित कायदा २0१५च्या ५ (क), ९, ११ कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी, आकोटचे ठाणेदार कैलास नागरे, तेल्हार्‍याचे ठाणेदार अन्वर शेख यांनी दहीहांडा येथे भेट दिली. या गुन्ह्याचा तपास दहीहांडाचे ठाणेदार डी.पी.घुगे व पोलीस उपनिरीक्षक दोनकलवार हे करीत आहेत.