शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

शेतक-यांच्या दारातच कृत्रिम रेतनाच्या सुविधा

By admin | Updated: March 24, 2015 00:29 IST

केंद्राच्या गुरे पैदास कार्यक्रमाची आता राज्यातही अंमलबजावणी

अकोला- केंद्र सरकारतर्फे शंभर टक्के अनुदानावर राष्ट्रीय गुरे पैदास कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातही केली जाणार असून, त्या अंतर्गत देशी वंशावळीचे जतन करण्यासाठी शेतकर्‍यांच्या दारात कृत्रिम रेतनाची सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाने सोमवार, २३ मार्च रोजी प्रशासकीय मंजुरी दिली. केंद्र शासनाने २0१३ ते २0१७ या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाकडून अनुदानावर राबविण्यात येणार्‍या या कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांच्या दारापर्यंत गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नैसर्गिक संयोगाकरिता उच्च प्रतीचे वळू उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेमुळे शेतकर्‍यांना गुरे पाळण्यास प्रोत्साहन मिळणार असून, उच्च प्रतीचे गुरे पाळल्यामुळे राज्यात दुग्ध विकासालाही चालना मिळणार आहे.

*देशी वंशावळीचे होणार जतन

      गुरे पैदास कार्यक्रमांतर्गत देशी वंशावळीच्या गुरांचे जतन करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी देशी वंशावळीच्या संरक्षणाकरिता संबंधित देशी जातीच्या पैदास क्षेत्रामध्ये कृत्रिम रेतनासाठी गोठीत रेतमात्रा आणि नैसर्गिक संयोगाकरिता संबंधित जातीचे उच्च प्रतीचे वळू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशी वंशावळीचा र्‍हास व नाश थांबविणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

*गोकूळ ग्राम योजना

   गुरे पैदास कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गोकूळ ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासनाने ३0९ कोटी रुपयांचा निधी २0१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी २0४ कोटी रुपयांची तरतूद राष्ट्रीय गुरे पैदास व उर्वरित १0५ कोटी रुपयांची तरतूद राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 *अंमलबजावणीची जबाबदारी अकोल्यावर

      राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात राष्ट्रीय गुरे पैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला या संस्थेवर सोपविण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त करून घेणे आणि राज्यात कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, आदी जबाबदारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे सोपविण्यात आली आहे.