शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या दारातच कृत्रिम रेतनाच्या सुविधा

By admin | Updated: March 24, 2015 00:29 IST

केंद्राच्या गुरे पैदास कार्यक्रमाची आता राज्यातही अंमलबजावणी

अकोला- केंद्र सरकारतर्फे शंभर टक्के अनुदानावर राष्ट्रीय गुरे पैदास कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातही केली जाणार असून, त्या अंतर्गत देशी वंशावळीचे जतन करण्यासाठी शेतकर्‍यांच्या दारात कृत्रिम रेतनाची सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाने सोमवार, २३ मार्च रोजी प्रशासकीय मंजुरी दिली. केंद्र शासनाने २0१३ ते २0१७ या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाकडून अनुदानावर राबविण्यात येणार्‍या या कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांच्या दारापर्यंत गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नैसर्गिक संयोगाकरिता उच्च प्रतीचे वळू उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेमुळे शेतकर्‍यांना गुरे पाळण्यास प्रोत्साहन मिळणार असून, उच्च प्रतीचे गुरे पाळल्यामुळे राज्यात दुग्ध विकासालाही चालना मिळणार आहे.

*देशी वंशावळीचे होणार जतन

      गुरे पैदास कार्यक्रमांतर्गत देशी वंशावळीच्या गुरांचे जतन करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी देशी वंशावळीच्या संरक्षणाकरिता संबंधित देशी जातीच्या पैदास क्षेत्रामध्ये कृत्रिम रेतनासाठी गोठीत रेतमात्रा आणि नैसर्गिक संयोगाकरिता संबंधित जातीचे उच्च प्रतीचे वळू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशी वंशावळीचा र्‍हास व नाश थांबविणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

*गोकूळ ग्राम योजना

   गुरे पैदास कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गोकूळ ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासनाने ३0९ कोटी रुपयांचा निधी २0१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी २0४ कोटी रुपयांची तरतूद राष्ट्रीय गुरे पैदास व उर्वरित १0५ कोटी रुपयांची तरतूद राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 *अंमलबजावणीची जबाबदारी अकोल्यावर

      राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात राष्ट्रीय गुरे पैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला या संस्थेवर सोपविण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त करून घेणे आणि राज्यात कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, आदी जबाबदारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे सोपविण्यात आली आहे.