शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

अर्धरब्बी तूर, तिळाची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करा!

By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST

विदर्भातील शेतकर्‍यांना सल्ला;पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे आपत्कालिन नियोजन.

अकोला : विदर्भात पाऊसच नसल्याने खरिपातील पिकांना झळ बसली असून, अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवे आपत्कालिन पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये अर्धरब्बी तूर व तीळ आदी पिकांची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पेरण्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, अनेक शेतकर्‍यांनी पेरणी थांबविली आहे. त्यामुळे पेरणी न झालेल्या क्षेत्रावर पुरेसा पाऊस झाल्यावरच शेत पेरणी करण्याचा सल्ला या नियोजनात देण्यात आला आहे.अर्धरब्बी पिकांच्या पेरणीसाठी अनेक वाण व पेरणीसंबंधी माहिती देण्यात आली आहे. यात सलग तूर पेरणी करायची असल्यास शेतकर्‍यांनी पीकेव्ही तारा, आशा (आयसीपीएल ७१९) बीएसएमआर ७३६,सी-११ यापैकी एक वाण वापरावे, लागवड करताना ४५ बाय २0 असे अंतर ठेवावे. अर्धरब्बी तूर व अर्धरब्बी तिळाची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करता येते.पर्यायी पिके घ्यावयाचे असल्यास सूर्यफुल, तीळ एन-८,एकेटी-६४,बाजारी पिकेव्ही राज, श्रद्धा, सबुरी हे तर एरंडीचे एकेसी-१,जीसीएच-४, ५, ६, डीसीएच-११७, ३२ चे वाण पेरणीसाठी वापरावे. यामध्ये शेतकर्‍यांना बाजरी-तूर, सूर्यफुल-तूर, तीळ-तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येईल. पाऊस चांगला झाल्यास पावसाचे पाणी जागेवरच मुरवावे लागणार असून, मातीची धूप कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी जास्त पाणी झाले असेल, तेथील पाण्याचा निचर्‍याकरिता खरीप पिकामध्ये पेरणीनंतर ३0 दिवसांनी डवर्‍यांचा जानकुळास दोरी बांधून प्रत्येक दोन ओळीनंतर सरी पाडणे आवश्यक आहे. दरम्यान, जून, जुलैमध्ये पेरणी केलेल्या कपाशी, सोयाबीनला पाण्याचा ताण पडत असल्याने, त्या ठिकाणी ओलिताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे संरक्षण ओलित करण्याची गरज आहे. पेरणी न झालेल्या क्षेत्रावर रब्बी पिकाचे नियोजन करायचे असल्यास अशा जमिनीला वखराची आडवी व उभी पाळी देऊन जमीन तणविरहित ठेवावी. आलेल्या पावसाचे संधारण मात्र करावे लागणार आहे. पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांपुढे आता अर्धरब्बी पिकांचा पर्याय आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्यातील पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकर्‍यांनी या नियोजनानुसार पेरणी करणे अपेक्षित असल्याचे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी सांगीतले.