अकोला : विदर्भात पाऊसच नसल्याने खरिपातील पिकांना झळ बसली असून, अनेक ठिकाणी शेतकर्यांवर तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवे आपत्कालिन पिकांचे नियोजन केले आहे. यामध्ये अर्धरब्बी तूर व तीळ आदी पिकांची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पेरण्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, अनेक शेतकर्यांनी पेरणी थांबविली आहे. त्यामुळे पेरणी न झालेल्या क्षेत्रावर पुरेसा पाऊस झाल्यावरच शेत पेरणी करण्याचा सल्ला या नियोजनात देण्यात आला आहे.अर्धरब्बी पिकांच्या पेरणीसाठी अनेक वाण व पेरणीसंबंधी माहिती देण्यात आली आहे. यात सलग तूर पेरणी करायची असल्यास शेतकर्यांनी पीकेव्ही तारा, आशा (आयसीपीएल ७१९) बीएसएमआर ७३६,सी-११ यापैकी एक वाण वापरावे, लागवड करताना ४५ बाय २0 असे अंतर ठेवावे. अर्धरब्बी तूर व अर्धरब्बी तिळाची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करता येते.पर्यायी पिके घ्यावयाचे असल्यास सूर्यफुल, तीळ एन-८,एकेटी-६४,बाजारी पिकेव्ही राज, श्रद्धा, सबुरी हे तर एरंडीचे एकेसी-१,जीसीएच-४, ५, ६, डीसीएच-११७, ३२ चे वाण पेरणीसाठी वापरावे. यामध्ये शेतकर्यांना बाजरी-तूर, सूर्यफुल-तूर, तीळ-तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येईल. पाऊस चांगला झाल्यास पावसाचे पाणी जागेवरच मुरवावे लागणार असून, मातीची धूप कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी जास्त पाणी झाले असेल, तेथील पाण्याचा निचर्याकरिता खरीप पिकामध्ये पेरणीनंतर ३0 दिवसांनी डवर्यांचा जानकुळास दोरी बांधून प्रत्येक दोन ओळीनंतर सरी पाडणे आवश्यक आहे. दरम्यान, जून, जुलैमध्ये पेरणी केलेल्या कपाशी, सोयाबीनला पाण्याचा ताण पडत असल्याने, त्या ठिकाणी ओलिताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे संरक्षण ओलित करण्याची गरज आहे. पेरणी न झालेल्या क्षेत्रावर रब्बी पिकाचे नियोजन करायचे असल्यास अशा जमिनीला वखराची आडवी व उभी पाळी देऊन जमीन तणविरहित ठेवावी. आलेल्या पावसाचे संधारण मात्र करावे लागणार आहे. पाऊसच नसल्याने शेतकर्यांपुढे आता अर्धरब्बी पिकांचा पर्याय आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्यातील पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकर्यांनी या नियोजनानुसार पेरणी करणे अपेक्षित असल्याचे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी सांगीतले.
अर्धरब्बी तूर, तिळाची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करा!
By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST