शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

अल्पसंख्याकबहुल गावांसाठी राबविणार क्षेत्रविकास कार्यक्रम

By admin | Updated: September 24, 2015 23:46 IST

पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी राज्यातील २५0 ग्रामपंचायती पात्र.

अकोला: राज्यातील अल्पसंख्याक बहुल गावांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन तेथील अल्पसंख्याक नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून वर्ष २0१३-१४ पासून सुरू करण्यात आलेला क्षेत्रविकास कार्यक्रम वर्ष २0१५-१६ मध्ये सुरू ठेवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय २२ सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला. या क्षेत्रविकास कार्यक्रमासाठी राज्यातील २५0 अल्पसंख्याक गावे पात्र असून, प्रती ग्रामपंचायत १0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्हय़ांमधील अल्पसंख्याक बहुल गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामीण क्षेत्रविकास हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याक समूहाची (मुस्लीम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन व पारशी) लोकसंख्या किमान १00 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा विकासासाठी १0 लाख रुपये अनुदान देण्याची ही योजना आहे. याअंतर्गत कब्रस्तान, अंत्यविधीच्या जागेसाठी संरक्षक भिंत, पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा, सार्वजनिक सभागृह, अंतर्गत रस्ते, पथदिवे आदी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. सदर ग्रामपंचायतींना त्यांचे प्रस्ताव १0 लाख रुपयांच्या र्मयादेतच सादर करावे लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत अल्पसंख्याक ग्रामपंचायतींची यादी तयार करून शासनाने निर्धारित केलेल्या संख्येनुसार अल्पसंख्याक ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्तावांची अंतिम छाननी होऊन अनुदानासाठी ग्रामपंचायतींची निवड करण्यात येईल. शासनाकडून मंजूर झालेले अनुदान संबंधित जिल्हय़ाच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना वितरित केले जाईल

. *जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

         या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मागवून ते शासनाकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हय़ांमध्ये समिती गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांचा समावेश या समितीत आहे.